stress
stress sakal
लाइफस्टाइल

तणावग्रस्त आयुष्य तुम्ही जगताय, करा हे उपाय

सकाळ डिजिटल टीम

धावपळीच्या या आयुष्यात तणाव ही एक खुप मोठी समस्या आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीने तणाव निर्माण होतो आणि या तणावाने अनेकदा दैनदिन जीवनावर खुप खोलवर परिणाम पडतो.

तणाव दीर्घकाळ राहिल्यास कधी कधी चिंतेचे रूप धारण करतो. त्यामुळे मानसिक आजाराचेही बळी पडण्याची शक्यता असते. एकाग्रता लोप पावणे, डोकेदुखी सुरू होणे, थकवा वाटू लागणे चिडचिडेपणा येणे. अशा अनेक समस्यां निर्माण होतात. हा तणाव लवकरात लवकर घालवणे खुप जास्त गरजेचे असते.

कधी कधी तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धुम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाही. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी आपली जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.

तणाव दूर करण्यासाठी काय आहेत उपाय?

१. स्वत:साठी थोडा वेळ काढून योगासने आणि हलका व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे मन प्रसन्न वाटेल आणि तणाव दुर होईल.

२. दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे शरिरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते शरीरातील स्नायूंवरील ताण कमी झाल्याने त्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.

३. घरच्यांसोबत वेळ घालवा, मित्रांना फोन करा. मित्र-मैत्रीणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा. त्यामुळे मनावरील ताण कमी होतो.

४. आपला छंद आपला तणाव कमी करण्यास मदत करतो. वाचन, लेखन किंवा कोणत्याही छंदासाठी थोडा वेळ काढा. स्वतःची करमणूक करा. लक्ष त्याकडे केंद्रीत केल्याने तणाव हलका होण्यास मदत होते.

५. झोप ही आपल्या आयुष्यातील खुप महत्त्वाची बाब आहे. योग्य आणि आवश्यक ती झोप घेतल्याने तणाव कमी होतो. त्यामुळे आवश्यक ती झोप घेणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT