watermelon  sakal
लाइफस्टाइल

Health Tips: टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

तुम्हीही टरबूज खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता का?

Aishwarya Musale

उष्णता टाळण्यासाठी, स्वतःला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र, पाण्याव्यतिरिक्तही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खाल्ल्याने आपले शरीर हायड्रेट राहू शकते. फळांबद्दल बोलायचे झाले तर टरबूजमध्ये सर्वाधिक पाणी आढळते.

टरबूजमध्ये 92 टक्के पाणी असते. उन्हाळ्यात आंब्यानंतर खाल्ले जाणारे हे दुसरे फळ आहे. टरबूजला अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत मानला जातो, परंतु त्याच्या सर्व चांगुलपणानंतर, काही वाईट गोष्टी देखील आहेत. असे अनेक लोक म्हणतात की टरबूज खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. हे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. चला तर, टरबूज खाल्ल्यानंतर खरंच पाणी प्यायला हवं का, हे आज आरोग्य तज्ज्ञ डॉ. अजय यांच्याकडून जाणून घेऊया.

टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यावे का?

टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने तुमच्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवर परिणाम होऊ शकतो. टरबूजमध्ये पाणी, साखर आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. काही आरोग्य तज्ञ म्हणतात की सूक्ष्मजंतू आणि जीवाणूंना वाढण्यासाठी पाणी आणि साखर आवश्यक आहे. आता टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास ते गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये पसरण्याची शक्यता असते.

मात्र, दिल्लीचे जनरल फिजिशियन डॉ. अजय सांगतात की टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यावे की नाही, ते तापमानावरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही बाहेर ठेवलेले टरबूज खात असाल आणि नंतर थंड पाणी पीत असाल तर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. त्याचप्रमाणे फ्रिजमध्ये ठेवलेले टरबूज खाल्ल्यानंतर कोमट पाणी पिण्याचेही तोटे आहेत.

पाणी कधी प्यावे?

टरबूज खाल्ल्यानंतर किती वेळ पाणी प्यावे याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. डॉ. अजय सांगतात की टरबूजमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते खाल्ल्यानंतर लवकर तहान लागत नाही. ते खाल्ल्यानंतर एक तासानंतर पाणी पिता येते. टरबूज खाल्ल्यानंतर जास्त प्रमाणात लिक्विड घेतल्यास अतिसार किंवा उलट्या होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT