Holi Celebratrion 2024 esakal
लाइफस्टाइल

Holi Celebratrion 2024 : ३०० ते ५०० वर्षांपासून देशातल्या या  गावांनी होळी साजरी केलीच नाही, कारण...

गावकरी होळी दिवशी गायीला वासरू अन् महिलेला बाळ होण्याची वाट पाहतायंत

सकाळ डिजिटल टीम

Holi Celebratrion 2024 : 

तुम्हाला शोले चित्रपट आठवतोय का?. शोलेमध्ये होळी सणावेळी डाकू गब्बर सिंग सांबाला विचारतो की, होली कब है! त्यानंतर थेट होळीचा सणाचा जल्लोष दाखवला जातो. पण हे सुख प्रत्येकाच्या नशिबात नाही. कारण, भारतात अशीही काही गावं आहेत जे होळी साजरी करत नाहीत.

तुम्हाला वाटेल की होळीला दुसरं काहीतरी नाव असेल. किंवा होळी दुसऱ्या एखाद्या दिवशी साजरी करत असतील. तर असं नाहीय. भारतातील काही गावांनी होळीवर बहिष्कार टाकला आहे. होळी साजरी न करण्यामागेही अनेक कारणे आहेत. ती कारणं अन् गावं कोणती याची आज आपण माहिती घेऊयात.

होळी दिवशी एकमेकांना पडकून, मागे लागून होळीचे रंग लावले जातात. लहान मुलं, अबालवृद्ध सगळेच पाण्यात चिंब होतात. रंगांची उधळण करतात. काही लोक रंगांपासून दूर राहतात. पण काही गावातील लोकांना ना रंगांची ऍलर्जी आहे ना रंग खेळण्यासाठी पाण्याची कमी पण तरीदेखील हे लोक होळी साजरी करत नाहीत. यातील पहिलं गाव आहे हरियाणा राज्यातील दुसेरपूर हे.

हरियाणातील दुरेसपूर 

या गावाने ३०० हून अधिक वर्षांपासून होळी साजरी केली नाही. ज्या दिवशी संपूर्ण देश रंगात न्हावून निघतो तेव्हा दुसेरपूर गाव कोरडं असतं. कारण एका सन्याशाने या गावाला शाप दिला होता.

त्याचं असं झालं होतं की, ३०० वर्षांपूर्वी गावातील काही लोकांनी होळीच्या मुहूर्ताआधीच होळी पेटवली होती. त्यामुळे गावातील एका सन्याशाने असे करू नका, होळीला मुहूर्त वेळ पाळणं गरजेचं असतं असे सांगत होता. पण गावकऱ्यांनी त्याच काही ऐकलं नाही. तसेच त्या सन्याशाची चेष्टाही केली. तेव्हा या साधूने पेटत्या होळीत उडी घेतली आणि गावकऱ्यांना शाप दिला.

तेव्हा घाबरलेल्या गावकऱ्यांनी साधूंची माफी मागितली. तेव्हा या गावात जेव्हा कधी होळी दिवशी एखाद्या गायीला वासरू आणि महिलेला बाळ होईल त्या दिवशी गावाची या शापातून मुक्तता होईल असे साधूंनी सांगितले.

उत्तराखंड

उत्तराखंडमधील कुरझन, क्विली आणि जौदला या गावांमध्ये ३०० वर्ष झाली होळी साजरी केलेली नाही. लोककथा अशी सांगितली जाते की, या गावांचे रक्षण त्रिपुरा देवी करते. आणि या देवीला दंगा आवडत नाही. म्हणजे जास्त आवाज आवडत नाही. त्यामुळे या गावांनी होळी करणेच बंद केले आहे. रूद्रप्रयाग जिल्ह्यात असलेले ही गावे केवळ होळीच नाहीतर ध्वनी प्रदुषण होणारा कोणताही सण साजरा करत नाहीत.   

झारखंड

झारखंडमधील बोकारोच्या जवळ असलेल्या दुर्गापूर गावात १०० वर्षांपासून होळी बॅन आहे. यामागील कारण असं सांगितलं जातं की, १०० वर्षांपूर्वी गावातील राजाच्या मुलाचे निधन होळी दिवशी झाले होते. त्यानंतर योगायोग म्हणजे होळी जवळ आली असताना अचानक राजाचीह प्रकृती बिघडली.

मृत्यू समोर दिसत होता अशात होळीचा दिवस उजाडला. तेव्हा राजाने गावकऱ्यांनो सुरक्षित रहायचे असेल तर होळी साजरी करू नका असा आदेश दिला अन् राजा यमसदनी गेला.राजाच्या मृत्यूनंतर गावकरी आजही तो आदेश पाळत आहेत.

गुजरात

गुजरातमधील बसानकाठा गावातील लोक २०० वर्षांपासून होळी साजरी करत नाहीत. त्यांचेही असे म्हणणे आहे की,  या गावाला काही साधूंनी शाप दिला होता. की जर होळी साजरी केली तर खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागेल. तेव्हापासून गावकरी होळी साजरी करत नाहीत.

तामिळनाडू

तामिळनाडुमध्येही होळी साजरी केली जात नाही. दक्षिण भारताच्या तुलनेत उत्तर भारतात होळी जल्लोषात साजरी केली जाते. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेदिवशी होळी साजरी केली जाते. तेव्हा दक्षिण भारतात मासी मागम साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT