mother child google
लाइफस्टाइल

प्रसूतीनंतर महिलांनी थंड पाणी टाळणे गरजेचे आहे का ? जाणून घ्या सत्य...

बाळंतपणादरम्यान आईला मिळालेला आहार, व्यायाम आणि आराम या गोष्टीही महत्त्वाच्या असतात.

नमिता धुरी

मुंबई : प्रसूतीनंतर महिलांना शरीराची झिज भरून काढावी लागते. यासाठी त्यांना गरम पदार्थ खायला दिले जातात. याउलट, त्यांना थंड पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात प्रसूती झालेल्या महिलांना थंड पाणी प्यावेसे वाटू शकते; मात्र यामुळे त्यांचे शरीर पूर्ववत होण्यास वेळ लागेल असे सांगितले जाते. खरेच असे आहे का ?

थंड पाणी प्यायल्याने शरीर पूर्ववत होण्यास विलंब होतो हे सत्य नाही. शरीराची झिज भरून निघण्याची प्रक्रिया तुमची प्रसूती नैसर्गिकरित्या झाली आहे की सिजेरीयन आणि तुम्हाला इतर कोणते आजार आहेत का, प्रसूतीमध्ये काही गुंतागुंत होती का यांवर अवलंबून असते. बाळंतपणादरम्यान आईला मिळालेला आहार, व्यायाम आणि आराम या गोष्टीही महत्त्वाच्या असतात.

शारीरिक झिज भरून काढण्यासाठी प्रसूतीनंतर गरम पाणी प्यावे असे सांगितले जाते. थंड पाणी प्यायल्याने सर्दी होते व गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यात अडथळे येतात असा समज आहे. थंड पाणी प्यायल्याने आईच्या दुधाच्या गुणवत्तेत आणि तापमानात फरक पडतो. यामुळे बाळाला सर्दी होते, असेही म्हटले जाते.

प्रसूतीनंतर पुरेसे पाणी पित राहाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पुरेसे पाणी न प्यायल्याने निर्जलीकरण, बद्धकोष्ठता आणि मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे प्रसूतीनंतर पुरेसे पाणी प्यावे. अशावेळी शरीरासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याची माहिती केवळ स्त्रीरोगतज्ज्ञांकडूनच घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT