mother child google
लाइफस्टाइल

प्रसूतीनंतर महिलांनी थंड पाणी टाळणे गरजेचे आहे का ? जाणून घ्या सत्य...

बाळंतपणादरम्यान आईला मिळालेला आहार, व्यायाम आणि आराम या गोष्टीही महत्त्वाच्या असतात.

नमिता धुरी

मुंबई : प्रसूतीनंतर महिलांना शरीराची झिज भरून काढावी लागते. यासाठी त्यांना गरम पदार्थ खायला दिले जातात. याउलट, त्यांना थंड पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात प्रसूती झालेल्या महिलांना थंड पाणी प्यावेसे वाटू शकते; मात्र यामुळे त्यांचे शरीर पूर्ववत होण्यास वेळ लागेल असे सांगितले जाते. खरेच असे आहे का ?

थंड पाणी प्यायल्याने शरीर पूर्ववत होण्यास विलंब होतो हे सत्य नाही. शरीराची झिज भरून निघण्याची प्रक्रिया तुमची प्रसूती नैसर्गिकरित्या झाली आहे की सिजेरीयन आणि तुम्हाला इतर कोणते आजार आहेत का, प्रसूतीमध्ये काही गुंतागुंत होती का यांवर अवलंबून असते. बाळंतपणादरम्यान आईला मिळालेला आहार, व्यायाम आणि आराम या गोष्टीही महत्त्वाच्या असतात.

शारीरिक झिज भरून काढण्यासाठी प्रसूतीनंतर गरम पाणी प्यावे असे सांगितले जाते. थंड पाणी प्यायल्याने सर्दी होते व गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यात अडथळे येतात असा समज आहे. थंड पाणी प्यायल्याने आईच्या दुधाच्या गुणवत्तेत आणि तापमानात फरक पडतो. यामुळे बाळाला सर्दी होते, असेही म्हटले जाते.

प्रसूतीनंतर पुरेसे पाणी पित राहाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पुरेसे पाणी न प्यायल्याने निर्जलीकरण, बद्धकोष्ठता आणि मूत्रमार्गात संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे प्रसूतीनंतर पुरेसे पाणी प्यावे. अशावेळी शरीरासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याची माहिती केवळ स्त्रीरोगतज्ज्ञांकडूनच घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Wildlife: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! अंबा नदीत आढळला परदेशी व दुर्मिळ 'अल्बिनो एलीगेटर गार' मासा; रायगडमध्ये दुर्मिळ परदेशी माशाचा शोध

सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी' मधलं 'सुपरनोव्हा' गाणं प्रदर्शित; पण सुपरनोव्हा म्हणजे काय?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! पत्नीशी वादानंतर पतीने घर पेटवले; तीन पाळीव मांजरांचा मृत्यू

Kinwat Forest Department: किनवट वन विभागाला हायकोर्टाचा झटका; RTI माहिती न दिल्याप्रकरणी अधिकाऱ्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT