लाइफस्टाइल

Janhavi Kapoor : जान्हवी कपूर रोज सकाळी एक चमचा तूप का खाते?

बाई जान्हवी तू रोज तूप का खातेस गं?

सकाळ डिजिटल टीम

तूप खाण्याने रूप येतं नसतं असं म्हणतात. पण विचार केला तर खरंच असं होतं का?, याबद्दल साशंकताच आहे. डायट करणारे लोक तर तूपासापून चार हात लांबच असतात. कारण, साधारणपणे तुपाचे नाव घेताच वजन वाढण्याचा विचार लोक करतात.

इतकेच नाही तर अनेक लोक तुपाचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक मानतात. पण, तुम्हाला माहीत आहे का की, जेवणाची चव वाढवण्यासोबतच तुमची त्वचा आणि तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासही तूप मदत करू शकते?

एका मुलाखतीत अभिनेत्री जान्हवी कपूरने सांगितले की ती रोज सकाळी एक चमचा तूप खाते. यामुळे फिटनेस आणि सौंदर्य अधिक खुलून दिसते. मी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा देशी तूप खाते. त्यानंतरच मी दिवसाची सुरूवात करते. चला तर मग जाणून घेऊया तुपाचा आपल्या आरोग्याला किती फायदा होतो.

न्यूट्रिशनिस्ट भक्ती अरोरा कपूर यांनीही जान्हवीच्या या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. त्यांनी तूपाने आपल्या शरीराला काय फायदा होतो हे सांगितले आहे.

- तूप तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तूपामध्ये असलेले नैसर्गिक डिटॉक्सिंग पॉवर आहे जी तुमच्या पचनक्रियेला मदत करते. पोट साफ होण्यास मदत करते

- तूप हे फिलर म्हणून काम करते आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. यामुळे तुमची हाडांची ताकद आणि उपाशी राहण्याची क्षमता वाढते.

- हे आतड्यांतील एन्झाईम्सचे नैसर्गिक उत्सर्जन वाढवते ज्यामुळे पचनशक्ती सुधारते. एकाग्रता आणि मेंदूचा विकास होण्यातही तूप फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT