Kitchen Tips
Kitchen Tips esakal
लाइफस्टाइल

Kitchen Tips : करपलेल्या भाताचे करायचे काय? अशा पद्धतीने घालवा भाताचा करपट वास

सकाळ डिजिटल टीम

Kitchen Tips :

काहीवेळा गृहिणींचे दुर्लक्ष होतं आणि शिजायला ठेवलेला भात अगदी करपून धुरळा होता. त्यामुळे करपलेला भात खावा लागतो आणि वर घरभर त्याचा वासही पसरतो. करपलेला भात वरवरचाच काढून खायला घेतला तरी त्याचा वास काही जात नाही. त्यामुळे एखाद्याच्या पटकन लक्षात येतं की भात करपलेला होता.

अशा परिस्थितीत काही सुचत नाही. तेव्हा संपूर्ण भात फेकून द्यावा लागतो. पण, असं न करता करपलेल्या भाताचा वास घालवण्याचे काही उपाय करून तुम्ही करू शकता. या उपयानी तुमच्या भाताचा करपट वास निघून जाईल.  

कांदा

करपलेल्या भाताचा वास घालवण्यासाठी एका मध्यम आकाराच्या कांद्याची गरज पडेल. यासाठी मध्यम आकाराचा कांदा सालासह चार तुकडे करून घ्या. हे तुकडे भाताच्या पातेल्यात किंवा कुकरमध्ये आत खोचून ठेवा. यानंतर कुकरचे झाकण लावा. १५ ते २० मिनिटांनी झाकण काढून पाहिलत तर भाताचा वास गेलेला असेल. भात वाढून घेताना त्यातील कांदा काढून टाका.

तूप

करपलेला भात परतून त्याचा वास घालवता येतो. त्यासाठी फोडणीच्या भांड्यात तूप गरम करून त्यात जिरे परतून घ्या. आणि ही फोडणी भातावर घाला. यामुळे तुपाचा घमघमाट भाताला लागेल अन् करपट वास निघून जाईल.

लसूण

आपण रोजच्या जेवणात लसूण वापरतो. लसणाचा फोडणीचा वास पटकन लक्षात येतो. तोच लसूण तुम्हाला या कामातही मदत करेल. तुपात लसणाच्या पाकळ्या घालून तडका द्या.   तयार तडका भातावर पसरवा. त्यानंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटानंतर झाकण काढा, अशाने त्यावरील जळका वास निघून जाईल.

फोडणीचा भात

भात जास्तच करपलेला असेल आणि दुसरा भात शिजेपर्यंत भूक शांत बसणार नसेल.तर, या भातातून करपलेला भात वेगळा काढा अन् चांगल्या भाताला परता. म्हणजेच कांदा, लसूण, कढीपत्त्याची फोडणी देऊन भात खाता येऊ शकतो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT