late Marriage 
लाइफस्टाइल

उशीरा लग्न केल्याने नात्यावर होतात ४ परिणाम

लग्न करण्यासाठी स्वत:ची एक वेळ घेणे अगदी बरोबर आहे

सकाळ डिजिटल टीम

लग्न कधी करावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण आपल्याकडे साधारण मुलगी २४, २५ वर्षांची आणि मुलगा कमावता म्हणजे २७, २८ वर्षांचा झाला कि त्याच्या लग्नाचं बघायला लागतात. घरातून,नातेवाईक, मित्र-मैत्रीणींकडून याबाबत त्यांना विचारणा होते. काहीजण तर दबाव टाकतात. लग्न करण्यासाठी स्वत:ची एक वेळ घेणे अगदी बरोबर आहे. पण उशीरा लग्न केल्यानेही अनेक समस्या येऊ शकतात. त्या समस्या समजून घेऊन कपल्सनी लवकर लग्न करणे गरजेचे आहे.

Couple

होतात ४ परिणाम

भांडणं वाढतात- उशीरा लग्न झाल्याने जबाबदारी आणि प्राथमिकता बदललेली असते. अशावेळी जोडपी एकमेकांना नीट समजून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात सारखे वाद व्हायला सुरूवात होते. वय वाढल्यावर तुमचा इगोही वाढतो. त्यामुळे साहजिकच दोघांच्यात भांडणे वाढण्याची शक्यता जास्त असते.

शारीरिक जवळीक नसणे- वय वाढल्यावर अनेक स्त्रियांना शारीरिक जवळीक नकोशी वाटते. त्या उदास राहू लागते. यामुळे नवरा बायकोतील भांडणं वाढतात. तसेच पुरूषांमध्ये वाढत्या वयामुळे टेस्टोस्टेरॉन कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे जवळीकांमधील रस संपतो.

couple arguments

वंध्यत्व वाढण्याची शक्यता- महिलांमध्ये तिशीनंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. पस्तीशीनंतर ती अधिक वेगाने कमी होते. स्त्री जसजशी मोठी होते तशी तिची गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते आणि वंध्यत्वाची शक्यता वाढते.

नात्याला जास्त महत्व देत नाही- आजच्या धावपळीच्या जगात मुलगा- मुलगी दोघेही नात्यापेक्षा करिअरला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांना योग्य वयात लग्न करता येत नाही. उशिरा लग्न करूनही ते नात्यापेक्षा करिअरला जास्त महत्त्व देतात, त्यामुळे नात्यात दुरावा येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भीषण दुर्घटना : एकादशीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी, चेंगराचेंगरीत ९ जणांचा मृत्यू

Viral News: ‘नाक कटवा’ची दहशत… भूत की माणूस? नेमकं कोण कापतंय लोकांची नाकं? पीडितांनी सांगितली भीषण कहाणी

Satyacha Morcha: मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! 'सत्याचा मोर्चा'पूर्वी वाहतूक निर्बंध आणि सुरक्षितता सल्लागार जारी

Akola Accident: मलकापूर हादरले दोन अपघातांनी! भरधाव वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा: कामांची निविदा प्रक्रिया 'सुपरफास्ट' करा; डॉ. प्रवीण गेडाम यांचे कार्यान्वयीन यंत्रणांना निर्देश

SCROLL FOR NEXT