Parenting Tips
Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : वयात येणाऱ्या मुलांवर सतत लक्ष ठेवून त्यांना सुधारता येत नाही!

Pooja Karande-Kadam

Parenting Tips : मुलांचा उत्तमरित्या सांभाळ करण्यासाठी पालकांना अनेक वळणांवरून जावे लागते. कधी मुलांना प्रेमाने समजावून सांगावे लागते, तर कधी त्यांच्या चुकीबद्दल त्यांच्याबाबत कठोर देखील व्हावे लागते.

मात्र काही काळानंतर पालक मुलांचे मित्र  देखील बनतात. तुम्हालाही आपल्या किशोरवयीन मुलांशी  मैत्री करायची असेल तर काही खास मार्गांनी तुम्ही त्यांच्यासोबत मैत्री करण्याठी पुढाकार घेऊ शकता आणि त्यांचे चांगले मित्र बनू शकता.

पालकांना त्यांच्या मुलांबद्दल नेहमीच काळजी असते. मग ते कितीही वयात आले तरी. मुलांची नोकरी, लग्न आणि इतर अनेक विषयांमुळे पालक चिंतेत राहतात. अशा परिस्थितीत लहान मुलांशी घट्ट नाते जपण्यासाठी मुलांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे आवश्यक आहे.

प्रत्येक पालकांना त्यांच्या मुलांची काळजी असते. मुले वयाच्या कोणत्याही टप्प्यावर पोहोचतात परंतु पालक त्यांच्यासाठी नेहमीच चिंतेत असतात. पालकांना त्यांच्या मुलांच्या यशाची नेहमीच काळजी असते. मुलाने बाहेरून ओळख निर्माण करणे, नोकरी मिळवणे, कुटुंब उभारणे यात उशीर होऊ नये, अशी त्यांना काळजी वाटते.

टेंपल युनिव्हर्सिटीचे मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स स्टीनबर्ग म्हणतात की पालकांची ही चिंता निराधार आहे. त्यांचा असा विश्वास आहे की या चिंता मोठ्या प्रमाणात निराधार आहेत.

न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्याने दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स स्टेनबर्ग म्हणतात की 30 वर्षांपर्यंत स्थिर न झालेल्या मुलांचे पालक कदाचित आळशी आहेत असे समजू शकतात, परंतु आजच्या मानकांनुसार ते योग्य आहेत.

आजचे पालक विचार करण्यास सक्षम आहेत, बहुधा मुले त्यापेक्षा जास्त विचार करतात. मानसशास्त्रज्ञ मानतात की एखाद्याने लहान मुलांमध्ये जास्त अडकणे टाळले पाहिजे. अशा परिस्थितीत काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

मुलांना सपोर्ट करा

पालकांनी स्वतःची तुलना वाढत्या मुलांशी करू नये. तुमचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. दोघांमध्ये दशकांचा फरक आहे. अशा परिस्थितीत देश आणि जगही काळानुरूप बदलत राहते. मुलांच्या लग्नाची किंवा कशाचीही काळजी करू नका. कारण आजकाल लग्नाचे वयही वाढले आहे. आजचा तरुण द्रष्टा आहे. त्यांच्या निर्णयाला पाठिंबा द्या.

मुलांच्या स्वातंत्र्याचा आदर करा

पालकांनी मुलांच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करू नये. लहान मुले अनेक गोष्टी आधीच्या पिढीपेक्षा वेगळ्या पद्धतीने करत असतील. त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, कपड्यांपासून ते खर्चापर्यंत सर्व काही मागच्या पिढीपेक्षा वेगळे आणि महागडे असेल. म्हणूनच पालकांनी मुलांच्या स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे.

मुलांच्या छोट्या चुका करूद्यात

छोट्या चुकांची लढाईची भावना वाढेल: लहान मुलांनी छोट्या चुका केल्या तर त्यांना त्या करू द्या, त्यामुळे त्यांच्यातील लढण्याची भावना वाढते. तज्ज्ञांचे मत आहे की, पालकांनी मुलांवर आपले मत लादू नये, जोपर्यंत ते कोणतेही चुकीचे काम करत नाहीत. पालकांनी मुलांवर अतिरिक्त दबाव टाकणे टाळावे.

एकत्रीतपणे बोला

पालक आणि मुलांमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल मतभेद किंवा विवाद असल्यास, सहकार्याने समस्या सोडवण्याच्या तंत्राची मदत घ्या. पालक आणि मुलांनी एकत्र बसून आपापली मते मांडली पाहिजेत आणि उपायांवर एकत्रित विचारमंथन केले पाहिजे. तडजोड करण्यापेक्षा हे चांगले आहे, कारण दोन्ही पक्षांचे काही इनपुट आहेत. त्यामुळेच आपण एकत्र बसून तोडगा काढू शकतो.

बदल स्विकार करा

किशोरवयीन मुलांचा स्वभाव झपाट्याने बदल असतो. अशी मुलं अचानक आनंदी होतात, तर कधी नाराज होतात. अशा परिस्थितीत त्यांचं वय लक्षात घ्या आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या समस्यांचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. याशिवाय मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण सहकार्य करा.

वेळ द्यायला विसरू नका

काही पालक आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे मुलांना खूप एकटे वाटू लागते आणि ते हळूहळू तुमच्यापासून दूर होऊ लागतात. त्यामुळे तुमच्या कामातून वेळ काढून रोज थोडा वेळ मुलांशी बोला. तसेच त्यांच्या शालेय प्रोजेक्टमध्येही मदत करायला विसरू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT