Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 esakal
लाइफस्टाइल

Raksha Bandhan 2023 : राखी पौर्णिमेदिवशी भावाला ओवाळताना ताटात ठेवा या वस्तू, भावासाठी ठरेल लाभदायी!

Pooja Karande-Kadam

Raksha Bandhan 2023 : आपल्या शास्त्र अन् पंचागांत प्रत्येक नात्यासाठी एक वेगळा सण आहे. आई-वडिलांसाठी गुरूपौर्णिमा आहे, पती-पत्नीसाठी दिवाळी पाडवा आहे.तर, बहिण-भावासाठी रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे. या दिवशी भावाला आवडेल अशी राखी बहिण त्याला बांधते.

राखी पौर्णिमेला खास महत्त्व आहे कारण या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधून त्याच्या प्रगतीसाठी प्रर्थना करते. राखीची पौराणिक कथेबद्दल बोलायचे तर, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की,सर्वात आधी राखी ही पत्नीने पतीला बांधली होती.

ती पत्नी होती साक्षात इंद्रदेवांची पत्नी होती. एका आसुराशी युद्धासाठी जाताना इंद्रदेवांच्या पत्नीने या लढाईत विजय प्राप्त व्हावा म्हणून इंद्रदेवांच्या हातात एक दोरा बांधला होता.

पुढे भावाच्या उज्वल भविष्यासाठी, त्याला सुख, संपत्ती मिळावी म्हणून हे प्रथा पुढे सुरू झाली, अशी मान्यता आहे.

तर आता आपण आपल्या विषयावर बोलूयात. राखी बांधताना आई जशी करते तसेच मुलीही शिकतात.आईने ओवाळणीच्या ताटात काय काय ठेवलंय हे त्या पाहतात. अगदी तसेच तुम्हालाही करायचे असेल. पण, नेमकं आठवत नसेल तर आरतीच्या ताटात नक्की काय काय ठेवावं. कसं ठेवावं याबद्दल आपण बोलूयात.

ताट कोणतं असावं

सर्वात आधी तर आपल्याला ताट घ्यावं लागेल. तुमच्याकडे देवाची आरती करताना वापरलं जाणारं ताट तुम्ही घेऊ शकता. ते नसेल तर मग तांब्याचं किंवा पितळेचं ताट घ्यावं. आरतीच्या ताटात आता काही वस्तू ठेवाव्या लागतात. ज्या घरात शुभ मानल्या जातात.

पणत्या

आरतीच्या ताटात महत्वाचा मान मिळालेला अशा या पणत्या. पूर्वी लोक युद्धावरून परतले की त्यांना ओवाळून घरात घेतलं जात होतं. त्यांची अशीच प्रगती होत रहावी हा त्या मागील उद्देश होता.

तुम्हीही अशाच प्रकारे भावाला पेटत्या पणत्यांनी ओवाळलंत तर ते त्याच्यासाठी शुभ मानलं जाईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, कधीही एका पणतीने भावाला ओवाळू नका. नेहमी दोन पणत्या ताटात ठेवा. (Shravan 2023)

टिळा

कपाळावर टिळकासाठी कुंकू वापरले जाते. राखी बांधण्याचा विधीही कपाळावर रोळीचा तिलक लावून सुरू होतो. कुंकवाने केल्याने भावाला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो. तसेच ते अनेक प्रकारच्या ग्रहांपासून मुक्त होऊ शकतात.

अक्षता

अक्षता हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जाते. प्रत्येक शुभ प्रसंगी अक्षताचा वापर केला जातो. अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी आरतीचे ताट अखंड ठेवा आणि भावाच्या कपाळावर अखंड तिलक लावा. (Rakhi )

राखी

या दिवशी राखीला सर्वाधिक महत्त्व आहे. म्हणूनच पूजेच्या ताटात सर्वप्रथम राखी ठेवा. पहिली राखी देवाला अर्पण केली जाते असे मानले जाते. अशा स्थितीत या दिवशी बहिणींनी प्रथम देवाला राखी अर्पण करावी. त्यानंतरच भावाला राखी बांधावी.

मिठाई

रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर आरतीच्या ताटात मिठाई असलीच पाहिजे. टिळक आणि राखी बांधल्यानंतर भावांना मिठाई दिली जाते. या दिवशी भावाला मिठाई खाऊ घातल्याने नात्यात गोडवा कायम राहतो. (Raksha Bandhan 2023)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT