divorce
divorce esakal
लाइफस्टाइल

घटस्फोट झाल्यानंतर होणारा मानसिक त्रास कसा कमी कराल? सहा टिप्स वाचा

सकाळ डिजिटल टीम

'घटस्फोट हा मृत्यूपेक्षाही अधिक वेदनादायक असू शकतो' असे अभिनेता नितीश भारद्वाज गेल्याच आठवड्यात म्हणाला. त्याच आठवड्यात काही सेलिब्रिटींचेही घटस्फोट (Divorce) झाले. पण घटस्फोटाचा हा निर्णय घेणं सगळ्यांसाठी (People) इतकी सोपी गोष्ट नसते. आधी पुन्हा जमतयं का यासाठी प्रयत्न केले जातात. पण, जुळणं अगदीच अशक्य आहे असं वाटल्यावर घटस्फोट घ्यायचाच यावर शिक्कोमार्तब होतो. पण तो घेताना आणि झाल्यानंतर अनेक मानसिक (Mental Stress) आंदोलनातून जावं लागतं. अनेकांना नैराश्य येतं, दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असं वाटतं. थोडक्यात प्रचंड मानसिक त्रास होतो. पण या मानसिक त्रासातून बाहेर पडून पुन्हा आयुष्य सुरू करणं महत्वाचं ठरतं. त्यासाठी या काही टिप्स.

१) झालेले नुकसान स्विकारा. सुरुवातीच्या धक्क्यानंतर जे घडले त्या वास्तवाला सामोरे जाण्यास मन तयार नसते. मन दुखावलेलं असतं. राग आणि दुःखाच्या भावना अनावर होतात. त्यामुळे अशावेळी पहिली पायरी म्हणजे परिस्थितीचे वास्तव स्विकारा. आपल्याला कसे वाटते याबद्दल खरोखर प्रामाणिक असणे गरजेचे आहे.

२) वेदना सामान्यपणे स्वीकारा. वेदना हा निसर्गाचा एक भाग आहे, जे तुटलेले असते ते दुरूस्त करणे गरजेचे असते. तसेच जर ब्रेकअपच्या दु:खातून बाहेर येण्यासाठी आपल्याला तुम्हाला स्वतःची योग्य काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेली मदत घेणे अत्यंत गरजेचे आहे.

३)घटस्फोटामुळे जीवन संपले आहे आणि आपण पुन्हा कधीही प्रेम करणार नाही, असे तुम्हाला वाटू शकते. पण या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे तुम्ही अधिक मोकळे आणि सामान्य आयुष्य जगू शकता.

४) तुमचे कष्ट वाया घालवू नका, गुंतवणूक करा. तुमच्या वेदना गुंतवण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे तुम्ही चांगले व्यक्ती बनण्यासाठी आणखी काय करता येईल यासाठी प्रयत्न करा. तसेच तुम्ही घटस्फोटाच्या धक्क्यातून जात असलेल्या इतरांना आधार देऊन त्यांचेही जीवन अधिक आनंदी होण्यासाठी त्यांना मदत करू शकता.

५) स्वत: ला सावरण्यासाठी वेळ द्या. तुटलेला हात बरा होण्यासाठी सहा आठवडे लागतात. पण इथे मनाचा प्रश्न आहे. त्याला वेळ तर लागणारच.. यासाठी काहींना एक वर्ष किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. पण, दोन वर्षांनंतरही जर आपण आपल्या वेदना कमी करू शकलो नाही तर परिस्थिती अवघड होईल. अशावेळी तुम्हाला काउन्सिलरची मदत लागेल. तुम्ही तुमच्या सर्व भावना त्याच्याकडे मनमोकळेपणाने व्यक्त करा.

६) समोरच्याला क्षमा करा. आपण आपल्या दुखापती, राग आणि दु: ख या सर्व नकारात्मक भावनांचे निराकरण करणे आणि त्यापासून मुक्त होणे आवश्यक आहे. जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपण आपल्या नकारात्मक भावना आपल्या भविष्यातील सर्व जवळच्या नातेसंबंधांमध्ये परिणाम करू शकतात. हे लक्षात घ्या की अपयश येत जात असते. त्यामुळे जीवनाला पुन्हा संधी द्या. मोकळे व्हा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी वाचलो पण माझ्या डोळ्यासमोर लोक चिरडले"; प्रत्यक्षदर्शीच्या शब्दात होर्डिंग कोसळल्याची थरारक कहाणी वाचा...

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत, कोणत्या क्षेत्रात खरेदी?

GPT-4o : मैत्रिणीप्रमाणे गप्पा मारतो, व्हिडिओ पाहून सगळं ओळखतो.. Open AIचं सर्वात अ‍ॅडव्हान्स एआय टूल लाँच; पाहा व्हिडिओ

Amey Wagh: "आता कुठल्याही पक्षात जावं आणि कोणाही बरोबर युती करावी..."; मतदानानंतर अमेय वाघची खरमरीत पोस्ट

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपच्या शेड्यूलमध्ये गडबड, 24 तासांपेक्षा कमी अंतरात सेमीफायनल अन् फायनल?

SCROLL FOR NEXT