husband bite his wife on her wrist gets divorce 
लाइफस्टाइल

का रे दुरावा... नात्यात कायमचा दुरावा आल्यावर या 3 गोष्टींचा विचार करू नका...

सकाळ डिजिटल टीम

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाची घटना असते. काहींचे लग्न टिकते पण काही जोडप्यांमध्ये दुरावा येतो. पण नातं टिकविण्यासाठी अनेकजण एडजस्टमेंट करत असतात. ती नाही जमली किंवा खूपच ताण येत असेल तर मात्र वेगळं व्हायचा निर्णय घेतला जातो. आणि या नात्याची परिणिती घटस्फोटात होते.

मात्र अशाप्रकारे नाते तुटल्यावर दोघेहीजण वेदना, दु:ख, नकारात्मक भावनेतून जात असतात. त्यामुळे ते काही काळ एकटं राहण्याचा विचार करतात. पण हा एकटं राहण्याचा काळ त्यांच्यासाठी खूप त्रासदायक असतो. त्यामुळे यातून बाहेर पडणेही गरजेचे असते. मात्र हे करताना तीन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

आयुष्य इथेच संपत नाही- घटस्फोट झाल्यावर त्रास होणे ही अगदी साहजिक गोष्ट आहे. पण या सगळ्यातून बाहेर पडायला तु्म्हाला वेळ लागणार आहे. याचा अर्ध तुमचं आयुष्य संपलं असा होत नाही. तुम्हाला नवं आयुष्य सुरू करायला हवं. तशी संधी तुम्हाला तुमचं आयुष्य देत असतं. 

लग्न ही चूक नाही- घटस्फोट झाल्यावर लग्न करून चूक केली, घाई केली असे एक ना अनेक प्रश्न मनात येत असतात. पश्चातापाची भावना मनाला छळत असते. पण असा विचार करून स्वतला त्रास करून घेणे चुकीचे आहे. चूक तुमच्या एकट्याची नसते. दोघांचे विचार, मत अजिबात पटत नसल्याने आधीच ताण आलेला असतो अशावेळी नातं पुढे न नेण्याचा विचार होतो. पण लग्न चुकीचं आहे असे अजिबात समजायचे नसते. कदाचित त्यातून शिकून तुम्हाला सुधारणेला वाव मिळतो. 

नातं वाचविण्याचा प्रयत्न- कधी कधी लग्नानंतर जोडीदाराच्या काही गोष्टी प्रकर्षांने समोर येतात. त्याचा त्रास होऊ लागतो. कधीतरी असह्य होतं तेव्हा वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो. पण दरम्यान तुम्ही नातं टिकविण्याचा प्रयत्न केलेला असतो. तरी वेगळं होता. मात्र जर जर घटस्फोटानंतर  तुम्ही नातं वाचवण्याचा प्रयत्न केला नाही असं वाटत असेल तर याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशावेळी आधीच्या नात्यात काय चुका केल्या याचा तुम्ही विचार करणं गरजेचं असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: हजारो कोटींचा खर्च, सरकार बदललं, प्रकल्प आले... तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली का जाते? नेमकं चुकतंय कुठे? जाणून घ्या...

Organic farming: सेंद्रिय शेतीचा चमत्कार! वेल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्याच्या झाडाला तब्बल १९ किलोचा फणस; डोंगररानात सेंद्रिय शेतीची झेप..

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

SCROLL FOR NEXT