Water Intake In A Day esakal
लाइफस्टाइल

Water Intake In A Day : दिवसभरात किती पाणी प्यावे? जास्त किंवा कमी झाले तर...

शरीरातील प्रत्येक पेशी, ऊती आणि अवयव योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

सकाळ डिजिटल टीम

डॉ. रुषी देशपांडे,

डायरेक्टर क्रिटिकल केअर नेफ्रोलॉजी सर एचएन रिलायन्स हॉस्पिटल, मुंबई.

Water Intake In A Day : पाणी हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मानवी शरीराचा अंदाजे ५० ते ६० % भाग पाण्याने बनलेला असतो. शरीरातील प्रत्येक पेशी, ऊती आणि अवयव योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

पाणी आपल्या शरीराला घाम, लघवी किंवा मल याद्वारे शरीरातील टाकाऊ पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करते. हे शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत करते, सांध्यांना वंगण घालते, पचनास मदत करते आणि तुम्हाला पुरेशी ऊर्जा देण्यास मदत करते. तुमच्या शरीरात जर पुरेसे पाणी नसेल तर डिहायड्रेशन होऊन तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

पाणी पिण्याच्या बाबतीत निश्चित असे कोणतेही एक सूत्र नाहीये. पाणी पिणे हे वय, अॅक्टिव्हिटी लेव्हल, हवामान आणि रोग यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते ज्यासाठी पाणी फार आवश्यक असते.

इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनने केलेल्या अभ्यासानुसार

  • पुरुषांना दररोज अंदाजे १३ कप (३ लीटर) द्रवपदार्थाची आवश्यकता असते

  • आणि महिलांना दररोज अंदाजे ९ कप (२.२ लीटर) द्रवपदार्थाची आवश्यकता असते, यात ज्या अन्नामध्ये द्रव देखील असते त्याचा ही समावेश आहे.

  • तर मुलांनी दररोज सुमारे १.५ ते २.५ लीटर प्यावे

  • गरम हवामान, शारीरिक श्रमामुळे भरपूर घाम येणे अशा परिस्थितीत सेवन वाढवावे.

  • मूत्रपिंडाचा आजार, यकृत सिरोसिस, हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांना द्रव सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे.

जास्त पाणी पिण्याचे धोके

जशी तहान लागेल तसे पाणी प्यावे. जास्त पाणी पिणे ही हानिकारक असू शकते आणि त्यामुळे रक्त पातळ होते आणि सोडियमची पातळी कमी होते ज्यामुळे हायपोनेट्रेमिया होऊ शकते.

तसेच, जर तुमच्या शरीरात जास्त पाणी असेल तर तुम्ही रंगहीन लघवी कराल आणि तुम्हाला तहान लागणार नाही. तसेच, जास्त पाणी पिण्यामुळे शरीरात द्रव टिकून राहून पाय सुजतात आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

मूत्रपिंड हे बियांच्या आकाराचे असते जे आपल्या शरीराच्या दोन्ही बाजूंना असते.

किडनीमध्ये पाणी आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन, ऍसिड बेस बॅलन्स, एरिथ्रोपोइसिस आणि युरेमिक विष काढून टाकणे यासारखी विविध कार्ये करते.

मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी

  • मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे,

  • नियमित व्यायाम करणे,

  • जंक फूड टाळणे

  • मिठाचे सेवन मर्यादित ठेवणे.

  • प्रतिरोधक गोळ्या, वेदनाशामक औषधे टाळावीत

  • धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन टाळा.

  • नियमित रक्त तपासणी करा

  • आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT