लाइफस्टाइल

सर्वसामान्यांप्रमाणं मृत्यूनंतर साधूंचं दहन का केलं जात नाही? जाणून घ्या...

शरयू काकडे

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचं आज शवविच्छेदन पार पडणार आहे. त्यानंतर त्यांचा मृतदेह आप्तेष्टांकडे सोपवण्यात येईल. आज दुपारी पोस्टमॉर्टेमनंतर गिरी यांच्या मृतदेहाला भूसमाधी दिली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये अंत्य संस्कार करताना लोकांचे दहन केले जाते. मग, नरेंद्र गिरी यांना दफन का करण्यात येत आहे हे जाणून घेऊ या...

साधूंना पवित्र आत्मा मानले जाते. हिंदू धर्म माननरे लोक आत्माच्या अस्तिवावरही विश्वास ठेवतात. मृत्यूनंतर तो आत्मा स्थानांतरीत होतो असेही मानले जाते. पुनर्जन्म तेव्हाच होतो जेव्हा आत्मा कोणतीही व्यक्ती जीवनचक्रादरम्यान सर्व बंधनातूनक मुक्तो होतो असे मानले जाते.

मृत्यूनंतर शरीर नष्ट होते पण आत्मा तोपर्यंत बंधनात अडतून राहतो जोपर्यंत तो नश्वर अवशेष भौतिकरूपात उपलब्ध असतात. हिंदू मान्यतेनुसार शरीराचे अंतिम संस्कार केल्यामुळे संसारिक बंधन संपतात. त्यामुळे आत्माला संसारिक गरजांमधून तो मुक्त होणाचा मार्ग मिळतो.

एक संन्यासी सर्व संसारिक बंधनाचा आणि सुखांचा त्याग करुन संत बनतात. अशा व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा असे मानले जातेकी संन्यासी भौतिक शरिर सोडून देतात आणि मृत्यूनंतर कपाळ मोक्षद्वारे अमरता प्राप्त करतात. साधू-संताचे प्राण एका दिव्य मार्गाद्वारे शरिर सोडून देतात असे मानले जाते.

साधू आणि संताबाबत अशी मान्यता आहे की भौतिक शरीर कित्येक बंधनातून मुक्त होते. अशावेळी दहन संस्कारशिवायच त्यांची आत्म्याला मुक्ती प्राप्त होते.

(वरील लेखातून कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवण्याचा सकाळ मध्यम समूहाचा उद्देश नाही)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper leak: मनीषा हवालदार यांनी प्रश्नमालिकेच्या नोट्स जाळून टाकल्या; पतीच्या फोनवरुन मांढरेंना टाकले प्रश्न

IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मोठा डाव खेळला, पंजाबच्या चहलला संघात दाखल करून घेतले; मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळवणार?

Marathi Live News update: भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नमंजुषा असलेल्या नोट्स मनिषा हवालदार यांनी जाळून केल्या नष्ट

Unseasonal Rain: अवकाळी पावसाने हाहाकार; लाखणगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आश्वासन

Mass Wedding Politics: बोईसरमध्ये २०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा; उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीने शिवसेनेत नाराजीची कुजबुज

SCROLL FOR NEXT