Koyna Dam Esakal
महाराष्ट्र बातम्या

1967 Koyna Earthquakes : कोयना धरणाने आजवर सोसलेत एक लाख 21 हजार भूकंपाचे धक्के!

अनेक गावांना पहाटे ४ वाजून २१ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला

सकाळ डिजिटल टीम

कोयना धरणाच्या परिसरामध्ये केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील सुमारे पाचशे गावे व छोटी शहरे उद‍्ध्वस्त झाली. महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींपैकी ही एक मोठी आपत्ती म्हणावी लागेल. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेल्या कोयना परिसरातील महाप्रलयकारी भूकंपास आज ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

११ डिसेंबर १९६७ च्या त्या घटनेच्या कटू आठवणी लोकांच्या मनात आहेत. त्या रात्री झालेला भुकंप इतका भयावह होता की त्याने  १८० बळी घेतले. कारण या भूकंपाच्या धक्क्याने १८५ जणांना आपला जीव गमवावा लागला. कोयना भागासह पाटण तालुक्यातील अनेक गावांना पहाटे ४ वाजून २१ मिनिटांनी भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. ६.५ ते ७ रिश्टर स्केल तीव्रता असलेल्या त्या भूकंपाने जमीन हादरली. कोयना भागासाठी ही काळरात्र ठरली. सुमारे ४० हजारांवर घरे भूकंपात बाधित झाली. आणि ९३६ जनावरे मृत झाली. अनेक ठिकाणी जमिनींना मोठ्या भेगा पडल्या होत्या. 

१९६३ सालापासूनच कोयना भूकंपमापक केंद्रावर भूकंपाच्या नोंदी घेण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत १ लाख २१ हजार २५७ धक्के या भागाने सोसले आहेत. १९६७ सालच्या त्या विनाशकारी भूकंपाच्या भेगा कालांतराने बुजल्या, मात्र भूकंपग्रस्तांच्या जखमा आजही ताज्या व भळभळणाऱ्या आहेत.

भूकंप कसा होतो?

पृथ्वीच्या कवचात कोणत्याही कारणाने वेग उत्पन्न होऊन तेथील खडकांना एकाएकी धक्का बसतो. त्या धक्क्याच्या स्थानापासून कंपने निर्माण होतात. ती सभोवार पसरतात आणि त्याने सर्वकाही उद्धस्त होते.

1967 च्या भूकंपानंतर कोयना धरणाच्या भिंतीला काही ठिकाणी सूक्ष्म तडे गेले होते. तातडीचे उपाय म्हणून 1969 पर्यंत हे तडे इपॉक्‍सी रेझिनने भरून काढण्यात आले आणि धरणाचा सांडव्याजवळच्या उंच भागात पोलादाच्या तारा माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत ओवून त्यांना ताण देण्यात आला. या तारा प्रतिबलित करून धरणाचा हा भाग शिवल्यासारखा एकसंध करण्यात आला. यास प्राथमिक स्थिरीकरण’ असे म्हणतात.

आजवरचे भूकंप

कोयना धरण झाल्यापासून कोयनेत भूकंप संशोधन व मापक केंद्र झाले. त्यामुळे ५७ वर्षांतील भूकंपाच्या नोंदी येथे आहेत. ५७ वर्षांत तब्बल एक लाख २१ हजार १३७ भूकंपांची नोंद आहे. तीन रिश्टर स्केलच्या आतील एक लाख १९ हजार ३७३, सौम्य धक्के म्हणजेच चार रिश्टर स्केलच्या आतील एक हजार ६५९ भूकपांचे धक्के बसले आहेत.

पाच रिश्टर स्केलपर्यंतच्या ९६ तर त्याहीपेक्षा जास्त नऊ भूकंपांची नोंदही आहे. दहा वर्षांत झालेल्या भूकंपांच्या धक्क्यांचा केंद्रबिंदू कोयनाऐवजी वारणा खोऱ्याकडे सरकला आहे. दहा वर्षांत तब्बल तीन हजार ११० भूकंपाचे धक्के जाणवले. त्यात २०१२ मध्ये सर्वाधिक एक हजार १४० तर २०१६ मध्ये सर्वांत कमी अवघे २७ भूकंपांचे धक्के आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Sahyadri : जंगलांची कत्तल सुरूच! सह्याद्रीतील वनक्षेत्र घटल्याने जैवविविधतेचा गंभीर इशारा

Pranita Kulkarni: मतदानाला गेला नाहीस तर पैसे का घेतले? भाजप नगरसेविकेचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी,इस्लाम पार्टी,समाजवादीची युती

New Year Party Dress: न्यू इयर पार्टीत सर्वांपेक्षा वेगळं दिसायचंय? ट्राय करा हे स्टायलिश बॉडीकॉन ड्रेस!

Nagpur Municipal Election : युतीत शिंदेसेनेला हव्यात २२ जागा; शिवसेनेच्या नेत्यांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT