Abu Azmi angry over decision to rename Aurangabad and Osmanabad Abu Azmi angry over decision to rename Aurangabad and Osmanabad
महाराष्ट्र बातम्या

नामांतराच्या निर्णयावर अबू आझमी नाराज, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने बुधवारी (ता. २९) बैठक घेत अनेक निर्णय घेतले. यामध्ये औरंगाबादचे नामांतर हा हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय होता. औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलल्याने समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी (Abu Azmi) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुस्लिमांना बाजूला करायचे आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. (Abu Azmi angry over decision to rename Aurangabad and Osmanabad)

आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली आहे. अशात राज्य सरकारने विविध निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. सलग तीन दिवसांपासून निर्णयाचा सपाटा सुरू आहे. काल पोलिस भरतीची घोषणा करण्यात आली होती. तसेच बुधवारी होणाऱ्या बैठकीत औरंगाबादचे नामांतराचा मुद्दा मांडणार असल्याचे सांगण्यात आले होते.

त्यानुसार आजच्या बैठकीत औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर करण्यास मंजुरी देण्यात आली. आता औरंगाबाद हे संभाजीनगर म्हणून ओळखले जाणार आहे. तसेच उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याला काहींचा विरोधही सुरू झाला आहे. यामध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी (Abu Azmi) यांचा समावेश आहे.

अबू आझमी यांनी याविषयी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे (Osmanabad) नाव धाराशिव करण्याचा निर्णय आज उद्धव ठाकरे सरकारने घेतला आहे. भाजप असो किंवा महाविकास आघाडी सरकार हे कुबड्यांवर चालत आहेत. यांना मुस्लिमांना बाजूला करायचे आहे, असे ट्विट अबू असीम आझमी यांनी केले आहे. या ट्विटवरून त्यांची नाराजी स्पष्ट दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT