ajit pawar google
महाराष्ट्र बातम्या

भोंगे बंद करण्यासंदर्भात अजित पवार म्हणाले, 'फक्त मशिदींवरील...'

धर्मांत तेढ निर्माण करुन राज्यात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरूये

सकाळ डिजिटल टीम

'धर्मांत तेढ निर्माण करुन राज्यात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरूये'

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं गढूळ झालं आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्यापासून ते हनुमान चालीसा पठण करण्यापर्यंत राजकीय वातावरण तापलं आहे. कोरोनानंतर राज्यात रोजगाराची समस्या निर्माण झाली असून त्याकडे लक्ष द्यायला हवं. धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं बंद व्हावं. भोंग्याचे राजकारण बाजूला ठेवून लोकहितासाठी आवश्यक असणारे निर्णय घ्यायला हवेत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसेला लगावला आहे. भोंगे उतरवणे आणि हनुमान चालीसा पठण असे विषया हाताशी धरुन राज्यात वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे फक्त मशिदीवरील भोंगे बंद होणार नाहीत. असं मतही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. आज ते सोलापुरात बोलत होते.

राज ठाकरे यांनी भोंग्यांसंदर्भात योगी सरकारचे कौतुक केलं आहे. यावर अजित पवार म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंग उतरवण्याचा निर्णय घेतला आणि मनसेनं त्यांचं कौतुक केलं. मात्र या निर्णयानंतरही सुप्रीम कोर्टाने सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत स्पीकरला परवानगी दिली आहे. महत्वाच्या पंधरा दिवसांत म्हणजेच काही लोकांच्या जयंतीच्या दिवसांना ही वेळ वाढवून रात्री बारापर्यंत केली असल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं आहे.

हनुमान चालीसा पठणावरून उपमुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. ते म्हणाले, हनुमान चालीसा म्हणायची तर तुमच्या घरी म्हणा. एक खासदार आणि आमदार म्हणून तुम्ही जनतेच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं, मात्र तुम्ही या विषयात अडकला आहात. मशिदींवरील भोंगे बंद करा अन्यथा तुमच्या घरी हनुमान चालीसा म्हणत तुम्ही धर्मांमध्ये तेढ निर्माण करत आहात. ज्यामुळे वातावरण खराब होते अशा गोष्टी करायचे कारण काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

सध्या राज्यात कोरोनामुळे अर्थव्यवस्था मोठ्या समस्येला तोंड देत आहे. रोजगार कौशल्य विकासाचे महत्वाचे निर्णय घेणे गरजेचे असताना, धार्मिक तेढ निर्माण करणारे निर्णय घेतले जात आहेत, हे हानीकराक आहे. राज्यात कायदा सुवव्यवस्था राखणे आणि वातावरण खराब होणार याची काळजी घेणे आवश्यक आहे. महत्वाच्या निर्णयांपैकी केंद्राने काही निर्णय घेतले आणि ते राज्यसाठी उपयोगी असतील तर राज्यासरकार त्याची अमंलबाजवणी करणार, अशी ग्वाहीही अजित पवार यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT