Ashok-Chavan 
महाराष्ट्र बातम्या

अजित पवारांनी आतातरी परत यावं - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांनी आतातरी परत यावे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या गटनेतेपदी आज (मंगळवार) बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर काँग्रेसने सर्व आमदारांच्या सह्या घेऊन राज्यपालांना पत्र दिले आहे. अजित पवार भाजपसोबत गेल्याने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता अजित पवारांचे मन वळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांच्या भेटी घेण्यात येत आहेत. अशोक चव्हाण यांनीही त्यांनी परत यावे असे म्हटले आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, की काँग्रेसकडून कामकाज सुरळीत व्हावे यासाठीच प्रयत्न करण्यात येतील. उद्या विधानसभेच्या कामकाजात गोंधळ होणार नाही. भाजपविरोधात आम्ही सर्व एक आहोत. आमच्याकडे 162 आमदारांचे समर्थन आहे. महाविकासआघाडी उद्या बहुमत सिद्ध करेल. 

काँग्रेसचा गटनेता म्हणून माझी निवड झाल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानतो. हंगामी अध्यक्ष सर्वांत जास्त कार्यकाळ असलेल्याला देण्यात येतो. आता राज्यपाल निर्णय घेतील. हे अल्पमतातील सरकार आहे, हे आम्ही सिद्ध करू, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : जयंत पाटील हे घाबरणारे नेते नाहीत - रोहित पवार

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT