modi and shaha modi and shaha
महाराष्ट्र बातम्या

'मोदी-शहांच्या हट्टामुळे देश आज सरणावर'

अरविंद सावंत म्हणतात, मोदी- शहांनी देशाला मरणाच्या खाईत लोटलं

प्रमोद सरवळे

औरंगाबाद: सध्या देशातील पाचही राज्यांचे निकाल स्पष्ट होत आहे. पश्चिम बंगालच्या निकालाकडे सर्व देशाचे लक्ष होते. भाजपाने पश्चिम बंगालची सत्ता मिळवण्यासाठी सगळी फौज मैदानात उतरवली होती. भाजपाचे अनेक नेते बंगालमध्ये शड्डू ठोकून होते. काही वेळात स्पष्ट निकाल येतील.

एकीकडे देशात कोरोना कहर होत असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री प्रचारात व्यस्त असल्याचे दिसले होते. मागील २४ तासांत देशात ४ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. यासंबंधी शिवसेनेचे नेते अरविंद सावंतानी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर जोरदार टीका केली आहे.

खासदार सावंत बोलताना म्हणाले की, मोदी आणि शहांच्या हट्टमुळे आज देश सरणावर गेला आहे. गरज नसताना निवडणूका करवून आणल्या आणि लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बंगालमध्ये आणले होते. यामुळे आता तिथेही कोरोनाचे मोठे आकडे येत आहेत. जरी भाजपाने कितीही प्रयत्न केला असला तरी पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच सत्तेवर येईल.'

'भाजप प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहे. त्यामूळेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशाला या दोघांनी मृत्यूच्या खाईत लोटलं आहे, अशी टीकाही खा. अरविंद सावंतानी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT