Ambabai, Jotiba Kolhapur Esakal
महाराष्ट्र बातम्या

अंबाबाई-जोतिबाच्या मंदिरातील दर्शनाच्या नियमांमध्ये बदल

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी आता तासाला केवळ चारशे भाविकांनाच ऑनलाईन बुकींग करून दर्शन मिळणार आहे. सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहील. एकूण पंधरा तासात सहा हजार भाविकांना दर्शनाची सुविधा मिळणार आहे. याबाबतचा निर्णय आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नाईकवाडे (Shivraj Naikwade)यांनी जाहीर केला.

लॉकडाऊननंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यानंतर दर्शनासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला असून, सध्या तासाला पंधराशे भाविकांना ऑनलाईन बुकींग करून दर्शन घेता येत होते. पण, आता दिवसा जमावबंदी आणि एकूणच कोरोना प्रतिबंधात्मक नियम कडक झाल्याने दर्शनावर पुन्हा मर्यादा आणली गेली आहे.

नवरात्रोत्सवानंतर शहरात पर्यटनाच्या (Tourism)हंगामाला वेग आला. शनिवार, रविवार आणि सलग सुट्ट्यांच्या काळात रोज वीस ते चोवीस हजार भाविकांनी अंबाबाई व जोतिबाचे दर्शन घेतले. मात्र, आता नव्या नियमानुसार तासाला चारशे भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. आजपासूनच या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

आम्ही विजयाच्या लायकीचेच नव्हतो..." भर मैदानात शुभमन गिल खेळाडूंवर भडकला, म्हणाला आम्ही जरा जास्त..

Sudan Famine: सुदानमध्ये ४ वर्षांच्या यादवीमुळे भीषण अन्नटंचाईचे सावट, दुष्काळसदृश्य स्थिती; कोट्यवधि लोकांचे स्थलांतर, हजारो मृत्यू..

अर्धनग्न करत केस कापले, महिलेला अमानुष मारहाण, मंदिर प्रवेशाचा वाद, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT