vaibhav naik challenge to narayan rane
vaibhav naik challenge to narayan rane 
महाराष्ट्र

'नारायण राणेंनी हफ्तेखोरांची नावे जाहीर करावीत', वैभव नाईकांचं आव्हान

दीनानाथ परब

मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं (Chipi Airport) आज उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र एकाच मंचावर दिसणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाआधीच श्रेयवादाची जोरदार लढाई रंगली आहे. नारायण राणे यांनी काल माध्यमांशी बोलताना आजच्या सभेत कोकणाच्या (kokan) विकासात कसे अडथळे आणले गेले, हफ्तेखोरी चालते या विषयी गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे.

त्या पार्श्वभूमीवर कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंनी नावे जाहीर करावीतच असे सांगितले. "आज चिपी विमानतळाचं उद्घाटन हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोन्याचा क्षण आहे. सिंधुदुर्गाचा विकास झाला पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे" वैभव नाईक यांनी सांगितले.

"चिपी विमानतळाचं काम १५-२० वर्षापूर्वी सुरु झालं. शिवसेना-भाजपा सरकार सत्तेवर आलं, त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते. तेव्हा विमानतळाचं फक्त १२ टक्के काम झालं होतं. खासदार विनायक राऊत आणि सुरेश प्रभू यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज हा विमानतळ होतोय" असे नाईक म्हणाले.

नारायण राणेंनी हफ्तेखोरांची नावे जाहीर करण्याच इशारा दिलाय. त्यावर वैभव नाईक म्हणाले की, "नारायण राणेंनी हफ्तेखोरांची नावे जाहीर करावीतच. आम्ही सुद्धा आमच्याकडची माहिती जाहीर करु. पण मला खात्री आहे, राणे ही नावे जाहीर करणार नाहीत"

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT