cm devendra fadnavis to face trial in sc for 2014 affidavit case 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्री फडणवीसांना दणका; सुप्रीम कोर्टात चालणार खटला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्यावर सुप्रीम कोर्टात खटला चालवण्यात येणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात माहिती लपविल्याप्रकरणी फडणवीस यांच्यावर खटला चालवण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?
महाराष्ट्रात 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवण्यात आल्याचा आरोप आहे. फडवणीस यांच्यावर दोन गुन्हे दाखल असून, ती प्रकरणी न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती फडवणीस यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेली नव्हती. याप्रकरणी ज्येष्ठ वकील सतीश उके यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने ती फेटाळून लावल्यानंतर त्यांनी पुढे सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश रंन गोगोई यांच्या खंडपीठाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात खटला चालणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस बजावली होती. तसेच या विषयावर बाजू मांडण्यास सांगितले. होते. त्यावर योग्य वळी उत्तर सादर केले जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सचिवालयातून माध्यमांना देण्यात आली होती. फडणवीस यांच्या विरोधातील याचिका तथ्यहीन असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले होते.

कायदा काय सांगतो?
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग केल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली आहे. हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर गेल्या वर्षी याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. कायद्यातील तरतुदीनुसार जर, मुख्यमंत्री फडणवीस दोषी आढळले तर, त्यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या राजुरा मतदारसंघात व्होटचोरी करून निवडून आला भाजप आमदार? राहुल गांधींनी आकडेवारीच मांडली

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Google Gemini Nano Banan AI Trend: 3D स्टाइल, रेट्रो साडीचा ट्रेंड पडला मागे, 'हे' घ्या नवे 20 प्रॉम्प्ट अन् साध्या फोटोला द्या नवा लुक

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Pune Crime : कोथरुडमध्ये गोळीबार; गाडीला साईड न दिल्याचा वाद की काहीतरी मोठं?

SCROLL FOR NEXT