Uddhav Thackeray and PM Modi Google file photo
महाराष्ट्र बातम्या

राज्याला केंद्राकडून रेमडेसिव्हिरची मदत; ठाकरेंनी मानले मोदींचे आभार

केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र राज्य सरकारला मिळाले आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र राज्य सरकारला मिळाले आहे.

Corona Updates : मुंबई : राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. तसेच रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे विनंती केली होती. याची दखल घेत केंद्र सरकारने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, त्यात आता ४ लाख ३५ हजारपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याच्या औषधी विभागाचे सहसचिव नवदीप रिनवा यांचे यासंदर्भातील पत्र राज्य सरकारला मिळाले आहे. यात म्हटले आहे की, २१ एप्रिल ते ३१ एप्रिलपर्यंतचा हा पुरवठा असणार आहे. देशभरातील राज्यांच्या मागणीप्रमाणे १६ लाख रेमडेसिव्हिर व्हायल्स केंद्राकडून पुरविण्यात येणार असून सात परवानाधारक उत्पादक कंपन्यांना प्राधान्याने हा पुरवठा करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनीही रेमडेसिव्हिरच्या कमतरतेकडे लक्ष वेधले होते. महाराष्ट्राला दररोज ६० हजार डोसची आवश्यकता आहे. पण सध्या १८ ते २० हजार डोसची कमतरता जाणवत आहे. परिणामी, रुग्णसंख्या वाढत चालली आहे, असे शिंगणे यांनी सांगितले.

दुसरीकडे दिवसभरातील मागणी लक्षात घेता राज्यात रेमडेसिव्हिरचा साठा पुरेसा आहे, पण त्याचे वितरण करणे हे आव्हानात्मक असल्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरचा वापर डॉक्टरांनी योग्य प्रकारे करावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते.

दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात ६७,१६० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर ६७६ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा मोठा असल्याने चिंतेचं वातावरण असलं तरी दुसरीकडे ६३,८१८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८२.०२% झाले आहे. राज्यात सध्या ६,९४,४८० अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण ६३,९२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT