corona update
corona update sakal media
महाराष्ट्र

मुंबईत रूग्ण वाढ राज्यात मात्र घट; महिनाभरात 10 टक्क्यांनी रूग्ण वाढ

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत एका महिन्यात रुग्ण संख्या (corona patients) 42 टक्क्यांनी वाढली. गेल्या महिनाभरात मुंबई राज्यापेक्षा 10 टक्क्यांनी रूग्ण वाढीत (patients increases) आघाडीवर आहे. राज्यात (maharashtra) उलट परिस्थिती असून ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये 33 टक्के रुग्णसंख्या (patients decreases) घटली आहे.

मुंबईत सप्टेंबर महिन्यात रुग्ण वाढल्याचे कारण म्हणजे नागरिकांचा सुरु झालेला प्रवास आणि मनोरंजन क्षेत्रातील निर्बंध शिथिल झाले आहेत. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, “ 15 ऑगस्टपासून लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठी रेल्वे प्रवास शक्य झाला आहे. हॉटेल्स सुरु झाले आहेत. लोकांचा प्रवास वाढला आहे. भेटणे वाढले आहे.

सप्टेंबरमधील रुग्णांची संख्या (12,994) ऑगस्ट (9,166) पेक्षा जुलैमध्ये (12,557) सापडलेल्या रुग्णांएवढीच आहे. मुंबईतील मृत्यूंमध्ये कमतरता आली असून ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये मृत्यूंमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये 157 मृत्यू होते ते सप्टेंबरमध्ये 133 वर पोहोचले आहेत. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या वाढली असली तरी ही वाढ भीतीदायक नाही. तसंच सक्रिय रुग्णांची संख्या जरी वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले नाही. शहरात गुरुवारी 451 रुग्ण आणि सात मृत्यूंची नोंद झाली. त्यानुसार, मुंबईचा कोविड रुग्णांचा आकडा एकूण 7.42 लाखांवर पोहोचला आणि 16,110 मृत्यूंची नोंद झाली.

1 सप्टेंबर रोजी गंभीर रुग्णांची संख्या 413 होती तर 29 सप्टेंबर रोजी ही संख्या घटून 273 वर पोहोचली,असं ही डॉक्टरांनी सांगितले. याच कालावधीतील आयसीयू रुग्णही कमी होऊन 602 वरून 495 वर आले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वेगवेगळी क्षेत्रे आता उघडले असूनही  राज्यभरातील रुग्णसंख्या कमी आहे. ज्यातून दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. तसेच राज्यातील मृत्यू ऑगस्टमध्ये 2,809 वरून या महिन्यात 1,754 वर पोहोचले आहेत. सप्टेंबरमध्ये मृत्यूची संख्या फेब्रुवारीनंतर सर्वात कमी आहे.

मृत्यू दर देखील कमी झाला असून सप्टेंबरमध्ये 1.3% मृत्यू दराची नोंद करण्यात आली जो ऑगस्टमध्ये 1.76% एवढा होता. मात्र, मुंबई आणि पुण्यासारखी शहरे अजूनही लक्षणीय संख्या नोंदवत आहेत, परंतु गंभीर रुग्णांची संख्या कमी झाली आहे आणि त्यामुळे बहुतेक रुग्ण घरी उपचार घेत आहेत किंवा रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण ही कमी आहे.

कोविड -19 राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्याची रुग्णसंख्या ही आठ महिन्यांतील सर्वात कमी आहे. जानेवारीची संख्या 94,123 होती. लसीकरणाने रुग्णसंख्या कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, परंतु लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. मास्क घातलाच पाहिजे.  भविष्यातील कोविड लाटेपासून वाचण्यासाठी दुसरा डोस लवकर घेणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT