Sharad Pawar
Sharad Pawar esakal
महाराष्ट्र

'चंद्रकांत पाटलांनी भाकीत व्यक्त करण्याचा व्यवसाय सुरू केलाय'

अभिजीत खुरासणे

माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 दिवसांत आघाडी सरकार पडणार, असं म्हंटलं होतं.

महाबळेश्वर (सातारा) : राज्यातील आघाडी सरकार हे उत्तम काम करीत आहे. कोणी कितीही म्हटले तरी हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. भविष्यात आम्ही पुन्हा एकत्र निवडणुका (Election) लढण्याचा निर्णय घेतला, तर पुढील पाच वर्षेही राज्यात आघाडी सरकारच सत्तेवर राहील, असा विश्वास राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

माजी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे १५ दिवसांत आघाडी सरकार पडणार, असे म्हटल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. पवार म्हणाले, ‘‘पाटील यांना आता काही काम उरले नाही. त्यामुळे त्यांनी आता नवीन भाकीत व्यक्त करण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असावा.’’ सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत शिवसेनेला विश्वासात न घेतल्याने शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे पराभूत झाले. पुढील काळात ते स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहेत. या प्रश्नावर श्री. पवार म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेची निवडणूक ही आघाडी करून लढविली नाही. सर्व उमेदवार हे स्वतंत्र उभे राहिले होते. काही उमेदवार हे सहकार पॅनेलच्या वतीने निवडणूक लढवीत होते. ही लोकशाही आहे. प्रत्येकाला स्वायत्तता आहे. त्यामुळे आलेला निकालही त्यांनी स्वीकारला पाहिजे.’’

आमदार शशिकांत शिंदे यांच्याबाबत ते म्हणाले, ‘‘शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती. नवनिर्वाचित बॅंकेतील संचालकांनी आता भविष्यात राजकारणाचे जोडे बाहेर काढून बॅंकेचा कारभार राजकारणविरहित केला पाहिजे.’’ राज्य परिवहन मंडळाची आर्थिक स्थिती बिकट आहे. १९४८ मध्ये राज्यातील पहिली एसटी रस्त्यावर धावली. तेव्हापासून कर्मचारी यांचे पगार देण्यासाठी कधी ॲडव्हान्स घेण्याची वेळ महामंडळावर आली नाही. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे महामंडळाची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे कर्मचारी यांचे पगारासाठी पाचशे कोटी रुपयांचा राज्य सरकारकडून ॲडव्हान्स घेण्याची वेळ या महामंडळावर आली.

एसटी हे सर्वसामान्यांना दळणवळणाचे महत्त्वाचे साधन आहे. कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी जर मान्य केली, तर राज्य शासनावर मोठा आर्थिक भार पडणार आहे. याचा विचार राज्य शासनाने केला पाहिजे. परिवहन महामंडळाप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांनीही मागणी केली आहे. अशा राज्यात १५ संस्था आहेत. त्या संस्थाही अशीच मागणी करतील. याबाबतही विचार झाला पाहिजे. एसटीमध्ये आता कोणती संघटना अधिकृत आहे, याचा निर्णय झाला पाहिजे. त्यामुळे विलीनीकरणाचा करार कोणाबरोबर करायचा हेही अद्याप स्पष्ट झाले नाही. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे विरोधकांनाही हे प्रकरण पेटविण्याची आयती संधी मिळाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात आघाडी सरकार आहे. भविष्यातील निवडणुका या एकत्र लढायच्या, की स्वबळावर याबाबतही पक्षाचे धोरण लवकरच निश्चित केले जाईल.

-शरद पवार, ज्येष्ठ नेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT