मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच पालकमंत्र्यांची घोषणा केली. यातल्या बहुतांश मंत्र्यांना दोन दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तब्बल सहा जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरुनच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टोला लगावला आहे.
पालकमंत्र्यांच्या घोषणेवरुन आज नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारने लोकशाहीची थट्टा चालवल्याची टीकाही केले. नाना पटोले म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असतो. या वेळची व्यवस्था वेगळी आहे. प्रशासनाचं व्यवस्थापन योग्य नाही. महाराष्ट्रात शासनच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाहीची थट्टा सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांची जबाबदारी आहे. ते आता स्पायडरमॅनसारखं काम करणार काय?
जाणून घ्या राज्यातल्या जिल्ह्यांचे पालकमंत्री:
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली
राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील - बुलढाणा,
दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
तानाजी सावंत-परभणी,
उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे - जालना, बीड,
शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.