Devendra Fadnavis And BJP Sakal
महाराष्ट्र बातम्या

छत्रपतींच्या गनिमी काव्याने हे नव सरकार आले : देवेंद्र फडणवीस

'जनतेच्या पाठिंब्यासाठी नेहमी ऋणात राहीन. पुढील अडीच वर्ष हे प्रगतीचे असतील.'

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : छत्रपतींच्या गनिमी काव्याने हे नवं सरकार आले आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज मंगळवारी (ता.पाच) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ते नागपूरमध्ये (Nagpur) आले आहेत. यावेळी फडणवीस यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाकडून त्यांची विजयी फेरी काढण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. (Devendra Fadnavis Says, This Government Come Into Power Using Chhatrapati Maharaj's Ganimi Kava)

महाराष्ट्रात राज्य कोण चालवत होते हे कळत नव्हते. सर्वोत्तम राज्य बनवण्याचे काम करणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिला. जनतेच्या पाठिंब्यासाठी नेहमी ऋणात राहीन. पुढील अडीच वर्ष हे प्रगतीचे असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जयहिंद, जय भारत अशा घोषणा फडणवीस यांनी दिल्या.

दोन दिवस राज्याच्या विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडले. सोमवारी (ता.चार) एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. दोन दिवसाचे अधिवेशन संपल्यानंतर फडणवीस हे आज नागपुरमध्ये आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT