Prithviraj Chavan
Prithviraj Chavan  Sakal
महाराष्ट्र

Video: चिंतन शिबिरात चिंतन नाहीच; चव्हाणांच्या काँग्रेसला कानपिचक्या

दत्ता लवांडे

पुणे : काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळ माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यातील चाललेलं राजकारण आणि काँग्रेसची देशातील पडझड यावर चर्चा केली. काँग्रेस पक्षासाठी पूर्णवेळ अध्यक्ष पाहिजे असं मत त्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केलं आहे.

(Former CM Prithviraj Chavan Interview)

दोन महिन्यांपूर्वी देशातील पाच राज्यात निवडणुका झाल्या आणि त्यातील एकाही राज्यात काँग्रेसला आपली सत्ता स्थापन करता आली नाही. देशातील सर्वांत मोठ्या पक्षाची झालेली पडझड पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष पाहिजे, त्यामुळे एखाद्यावर जबाबदारी पडते. यानंतर पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी चालना मिळते." असं ते म्हणाले.

पक्षाच्या पडझडीसाठी आणि पूर्णवेळ अध्यक्ष व्हावा यासाठी आम्ही कोरोना काळात पक्षांच्या श्रेष्ठींना गोपनीय पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये आम्ही पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षांची मागणी केली होती. त्यानंतर राहुल गांधी, सोनिया आणि प्रियांका यांनी आमच्यासोबत बैठक घेतली त्यानंतर त्यांनी आम्हाला पक्षाच्या निवडणुका घेण्याचं आश्वासन दिलं होतं पण त्यानंतर तसं काही झालं नाही असा टोमणा त्यांनी पक्षाच्या नेतृत्वावर लावला आहे.

"पाच राज्यातील निवडणुकानंतर भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेसच्या वतीने चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पण या शिबिरात कसलंच चिंतन झालं नाही." असं त्यांनी सकाळशी बोलताना सांगितलं. त्याचबरोबर पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे पक्षाचा म्होरक्या कोण आहे तेच कळत नाही.

"पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींने पुढाकार घ्यावा असं आम्हाला वाटतं पण ते काहीच बोलत नाहीत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असं आम्हाला वाटतं पण ते आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. नाहीतर पक्षाच्या अध्यक्षपदासाठी लोकशाही पद्धतीने निवडणुका व्हाव्यात असं आम्हाला वाटतं. त्यानंतर अध्यक्ष कुणीही झालं तरी आमचं काही म्हणणं नाही. निवडणुकानंतर प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी मिळाली तर काम करता येतात." असं ते यावेळी बोलताना म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT