school Sakal
महाराष्ट्र बातम्या

...तर पुन्हा शाळांना टाळे लागणार, शिक्षण मंत्र्यांचे संकेत

शाळा बंद करायच्या की नाही हे स्थानिक प्रशासन ठरवणार

निनाद कुलकर्णी

मुंबई : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील शाळा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या होत्या.(School Closed due to corona in maharashtra) मात्र, कोरोनाचे रूग्णसंख्या कमी झाल्यानंतर 16 डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले होते. (School reopen again in maharashtra) परंतु, ओमिक्रॉनची (Omicron) वाढती रूग्णसंख्या अशाच पद्धतीने वाढत राहिल्यास पुन्हा एकदा बंद करण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो, असे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. देशात ओमिक्रॉन बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. याबाबत एनएनआयने ट्वीट केले आहे. (If Omicron cases continue to rise, we may take a call to shut the schools again)

याबाबत बोलताना वर्षा गायकवाड (Varsha Eknath Gaikwad) यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांच्या (Corona) संख्येनुसार शाळा बंद करायच्या की नाही हे स्थानिक प्रशासन ठरवणार असल्याचे या आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईच्या घनसोली येथील शाळेतील अठरा विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्या सर्व विद्यार्थांचे विलगीकरण करण्यात आले होते. जर ओमिक्रोनची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिल्यास आम्हाला पुन्हा शाळा बंद करण्याबाबत विचार करावा लागू शकतो असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT