द्रुतगती महामार्ग. esakal
महाराष्ट्र बातम्या

महामार्गांवर ठेवा १०० पेक्षा कमी वेग! अतिवेगाने केला ४१ हजार व्यक्तींचा घात

सव्वातीन वर्षांत रस्ते अपघातात तब्बल ४१ हजार १७४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात प्रवासी, वाहक व चालकांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गांची कनेक्टिव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मागील सव्वातीन वर्षांत रस्ते अपघातात तब्बल ४१ हजार १७४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात प्रवासी, वाहक व चालकांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गांची कनेक्टिव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. अतिवेगाने त्यांचा घात केला आहे. पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांसह मुंबइ शहरात सर्वाधिक साडेनऊ हजारांहून अधिक अपघाती मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. चिंतेची बाब म्हणजे अपघात आणि अपघाती मृत्यू दरवर्षी दोन ते साडेतीन हजारांची वाढ होत आहे.

राज्यातील रस्त्यांवर वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून आता प्रत्येक व्यक्तीकडे एक वाहन, असे समिकरण पहायला मिळत आहे. कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी वाहने भरधाव वेगाने चालविली जात आहेत. अतिवेगाने वाहन चालविणे, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, विनाहेल्मेट दुचाकी तथा सिटबेल्ट न लावता चारचाकी चालवणे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे, या प्रमुख कारणांमुळेच रस्ते अपघात वाढल्याचे निरीक्षण महामार्ग पेालिसांनी नोंदविले आहे. तरीही, रस्त्यांवरील खड्डे, विनापरवाना उभारलेला गतिरोधक, महामार्गांवर वीजेची सोय नाही, अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी ठोस उपाययोजना नसणे, वाहतूक स्थानिक पोलिस, महामार्ग पोलिस, प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून केवळ दंड वसुलीला प्राधान्य, ही कारणेदेखील अपघात वाढीला कारणीभूत ठरली आहेत. जिल्हा स्तरावरील रस्ता सुरक्षा समितीचे नुसतेच कागदावर काम सुरु आहे. पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू झाले असून मुंबइ शहरातही दरवर्षी ४०० हून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

तीन वर्षतील रस्ते अपघात-मृत्यू
सन २०१९ २०२० २०२१ मार्च २०२२
अपघात ३२,९२५ २४,९७१ २९,४९४ ५,९९८
मृत्यू १२,७८८ ११,५६९ १३,५२८ ३,२८९
जखमी २८,६२८ १९,९१४ २३,०८० ४,३१६

महामार्गांवरील वेग मर्यादा निश्चित
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गांवर, घाट रस्त्यांवर वाहनांचा वेग किती असावा, याचे मापदंड २५ आक्टोबर २०१९ मध्ये निश्चित झाले आहे. त्यानुसार मुंबइ-पुणे महामार्गावर चारचाकी वाहनाचा वेग ताशी १०० तर इतर वाहनांसाठी ८० किलोमीटर निश्चित झाले. चारपदरी महामार्गांवर वाहनांचा वेग विशेषत: आठ प्रवासी असलेल्या वाहनांसाठी ९० चा तर मालवाहतूक वाहनांचा वेग ताशी ८० पेक्षा कमी असावा. दुचाकीसाठी ताशी ७० ची मर्यादा ठरली आहे. तीनचाकी वाहनांचा वेग चारपदरी महामार्गावर ताशी ६० असावा. घाटाचा रस्ता तथा वळणाचा रस्ता असल्यास वेगाची मर्यादा निम्म्याने कमी असावा, अशी नियमावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT