महाराष्ट्र बातम्या

'2021 मधील घोटाळेबाज शिवसेना नेत्यांवर ED ची कारवाई'

गेले काही दिवस यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाणही आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

गेले काही दिवस यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाणही आले आहे.

मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांवर विरोधकांकडून टीका सुरु आहे. आर्यन खान प्रकरण आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या भ्रष्टाचारावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपाचे किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी नेत्यांवर आरोप केले आहेत. गेले काही दिवस यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाणही आले आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी घोटाळेबाज शिवसेनेतील ED ची 2021 वर्षातील कारवाई झालेल्या नेत्यांची नावे सांगितली आहेत.

या ट्विटमध्ये शिवसेनेतील ६ नेत्यांची नावे सांगितली आहेत. यात घोटाळेबाज शिवसेना नेत्यांवर ED ची 2021 वर्षात कारवाई झालेले अर्जुन खोतकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, प्रताप सरनाईक, संजय राऊत, अनिल परब यांच्यावर कारवाई झाल्याचं त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, यांच्यावर कारवाई का झाली याची कारणे त्यांनी सांगितली आहेत. अर्जुन खोतकर जालना सहकारी साखर कारखाना घोटाळा, भावना गवळी १०० कोटीचा घोटाळा, आनंद अडसूळ सिटी बँक घोटाळा, प्रताप सरनाईक ७८ एकर जमीन जप्त, संजय राऊत HDIL ₹५५ लाख परत दिले, अनिल परब चोकशी सुरू अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. पुराव्यानिशा त्यांनी अनेक कोटीचा घोटाळ्यांवर सवाल उपस्थित केले आहेत. मात्र हे आरोप धुडकावत संबंधित नेत्यांनी यावर वेळोवेळी स्पष्टीकरणही दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2025: मोफत बस गणेशभक्तांसाठी की मतांसाठी? राजकीय स्पर्धा पेटली, राजकारण्यांमध्ये चढाओढ

Mumbai News: मुंबई पोलिसांची हद्द आता कोकणापर्यंत! पोलिस ठाणे उभे राहणार, कधी आणि कुठे? वाचा...

CM Devendra Fadnavis: राज्यातील ३,५०० गावे ‘इंटेलिजंट’ करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नागपुरातील सातनवरी येथे पहिला प्रयोग

Manoj Jarange-Patil: मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय परतणार नाही: मनोज जरांगे-पाटील; प्रश्न निकाली न लागल्यास इतिहास घडवणार

Nikki Bhati Murder Case : महिलेबरोबर फिरताना पकडला गेला होता विपीन भाटी, तेव्हा....; निक्की हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा!

SCROLL FOR NEXT