महाराष्ट्र बातम्या

शपथ घेण्याआधी काय म्हणतायत 'जितेंद्र आव्हाड' ?

सकाळ वृत्तसेवा, मुंबई

आज महाविकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होतोय. यामध्ये ठाण्याचे आमदार आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय जितेंद्र आव्हाड हे देखील शपथ घेणार आहेत.  जितेंद्र आव्हाड हे ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा मतदार संघातून निवडून येतात.  

राष्ट्रवादी काँग्रेसमधले फायरब्रँड नेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची ओळख जातात. पक्षातला ओबीसी चेहरा अशीही त्यांची ओळख आहे. आघाडीच्या काळातही त्यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं. जितेंद्र आव्हाड हे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि फलोत्पादन मंत्री राहिलेत.  

आपल्या वकृत्त्वाच्या जोरावर ते पक्षाची भूमिका ठामपणे मांडतात. सध्याच्या काळात शरद पवारांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो. महाविकास आघाडीच्या आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्यावरच होती. शिवाय आमदारांना कर्तव्यदक्षतेची शपथ देण्याची संकल्पानाही आव्हाडांनीच राबवली.

दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी माध्यमांशी संवाद साधला.  यावेळी बोलताना गोर गरीब जनतेसाठी काम करणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. तसंच आज होणारा शपथविधी माझी मुलगी पाहणार असल्याने मला आनंद होतोय असं आव्हाड म्हणालेत.  

काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड, पाहा व्हिडीओ : 

WebTitle : maharashtra cabinet expansion jitendra awhad before taking oath as minister

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

हिंदूंची जमीन मुस्लिमांच्या नावे केल्याचे आरोप, महिला अधिकाऱ्याच्या निवासस्थानी छापे; ९० लाखांची रोकड अन् कोट्यवधींचं सोनं जप्त

Latest Marathi News Updates : ऑक्टोबरपासून रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये मोठा बदल!

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

SCROLL FOR NEXT