Guardian Minister Bhujbal  
महाराष्ट्र बातम्या

Lockdown वाढणार की संपणार? मंत्री छगन भुजबळ म्हणतात...

राज्यात सध्या १ मे पर्यंत लॉकडाउन लावण्यात आलेला आहे

विराज भागवत

राज्यात सध्या कोरोनाचं संकट फार मोठं आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात १ मे पर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. कडक निर्बंधांच्या मदतीने सध्या कोरोनाला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा काहीसा सकारात्मक परिणामदेखील दिसतोय. त्यामुळे राज्यातील लॉकडाउन वाढणार का? अशी चर्चा सुरू आहे. त्याबाबत आज राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मत व्यक्त केलं.

"लॉकडाउनचा कालावधी वाढला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी नाशिक जिल्ह्यावरून सांगतो की माझ्या जिल्ह्यातील रूग्ण संख्या लॉकडाउन मध्ये कमी झाल्याचं मला दिसलं. नाशिक मोठा जिल्हा आहे. तेथील परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. अशा एका जिल्ह्याप्रमाणे राज्यातील कोविड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी झाल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे. त्यामुळेच राज्यातील लॉकडाउन वाढावा असं माझं स्पष्ट मत आहे, असं राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी एबीपीमाझाशी बोलताना सांगितलं.

"लॉकडाउन वाढवण्यात आला तर तो १० दिवसांचा असावा की १५ दिवसांचा ते मंत्रिमंडळाने ठरवावं. कारण लॉकडाउन कोणालाही आवडत नाही. मी स्वत:देखील लॉकडाउनच्या विरोधात आहे. पण राज्यातील स्थिती पाहता पर्याय नसल्याने काही निर्णय घ्यावे लागतात. अनेक ठिकाणी बेड्स संपलेत. ऑक्सिजन अपुरा पडतोय. रेमडेसिवीरचा पुरवठा कमी होतोय. अशा पद्धतीनेच सगळं सुरू राहिलं तर लॉकडाउन करून साखळी खंडित करणे हाच एक पर्याय आहे. आणि त्या जोडीने योग्य प्रकारे १०० टक्के लसीकरण हा पर्याय आहे", असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT