Ashok Chavan
Ashok Chavan 
महाराष्ट्र

काँग्रेसला दलबदलू लोकांची गरज नाही: अशोक चव्हाण

सकाळवृत्तसेवा

मुंबई : काँग्रेस सोडून ज्यांना जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. अशा दलबदलू लोकांची पक्षाला गरज नाही. असे संधिसाधू पक्षांतर करीत असतील तर काँग्रेसमध्ये नवे नेतृत्वही उभे राहील, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत असलेल्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना सुनावले. 

काँग्रेसमधील काही बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर चव्हाण पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले, "काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. असे संधिसाधू नेते किंवा नगरसेवक गेले तरी कॉंग्रेसच्या विचारांवर फरक पडणार नाही. उलट नव्या चेहऱ्यांना उत्तम संधी मिळेल.'' 

दरम्यान, काँग्रेसने नवीन कार्यकारिणी व युवक काँग्रेसची नव्याने रचना करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य व जिल्हा कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न आहेत. पक्षसंघटनेत सुमारे 50 टक्के नवीन चेहऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे दिसत आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT