Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: 'वक्त जरूर बदलता है' शिंदे गटाच्या १६ आमदारांचं काय होणार? राऊतांचं सूचक ट्विट

कोर्टाने पुढे ढकलली सुनावणी

रुपेश नामदास

सध्या महाराष्ट्र, देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. खरी शिवसेना कोणाची? यावर गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. सत्तासंघर्ष निर्णयक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे.

या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधताना महाराष्ट्र राज्य हे देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचे म्हटले आहे. त्याच्या या वाक्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

दरम्यान सुनावणीपूर्वी संजय राऊत यांनी एक शेर ट्विट केले आहे. 'मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिए... नसीब बदले या ना बदले,वक्त जरुर बदलता है', अशा मजकूराचा हा शेर आहे. कोर्टाकडून अपेक्षित अशा गोष्टी घडणार का हे पाहवं लागणार आहे.

मात्र सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. सत्तासंघर्ष प्रकरणी घटनापीठाने 8 मुद्दे निश्चित केले आहे.

यातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाने, सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे अशी मागणी मागच्या सुनावणीवेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

SCROLL FOR NEXT