marathi breaking news HSC exam results declared in Maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

बारावीचा 89.50% निकाल; मुलींची बाजी

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च 2017 मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला असून, यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात एकूण 89.50 टक्के निकाल लागला आहे. 

आज दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै महिन्यात होणार आहे. त्यासाठी पाच जूनपासून अर्ज भरण्यास सुरवात होईल. राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी निकाल यंदा 89.50 टक्के लागला आहे. यंदा 2.90 टक्क्यांनी निकाल वाढला आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 12,79, 406 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेला 15 लाख विद्यार्थी बसले होते. सर्वाधिक 95.20 टक्के निकाल कोकण या विभागाचा, तर सर्वांत कमी 88.21 टक्के निकाल मुंबई या विभागाचा लागला आहे.

परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी आवश्‍यक अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह बुधवार (ता. 31) पासून नऊ जूनपर्यंत विहीत शुल्क भरून अर्ज करता येईल. छायाप्रतीसाठी देखील बुधवारपासून 19 जूनपर्यंत अर्ज करता येईल.

उत्तरपत्रिकेचे फेरमूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्‍यक आहे. ती मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून शुल्क भरून विद्यार्थ्यांना विभागीय मंडळांकडे अर्ज करता येतील. फेरपरीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर नंतर जाहीर केले जाणार आहे, असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

मुलांना धीर द्या!
बारावीचा निकाल लागला असून, यात अनुत्तीर्ण झाले, तरी विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाणार नाही. कारण जुलै महिन्यात लगेचच फेरपरीक्षा आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण झाले, तरी विद्यार्थी आणि पालकांनी ताण घेऊ नये. याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शरद आखेगावकर म्हणाले, 'निकालानंतर खरी भूमिका पालकांनी बजवावी. पाल्य अनुत्तीर्ण झाला, तरी आम्ही तुझ्याबरोबर आहोत, असा धीर त्याला द्यावा. पुन्हा प्रयत्न कर, त्यातून तुला जुलै महिन्यात यश मिळेलच, असा विश्‍वास द्यावा.''

उत्तीर्णांची संख्या :
मुली : 93.5%
मुले : 86.65%

विभागनिहाय निकाल :
पुणे : 91.16%
कोल्हापूर : 91.40% 
कोकण : 95.20% 
लातूर : 88.22% 
मुंबई : 88.21% 
औरंगाबाद : 89.83% 
नागपूर : 89.05% 
नाशिक : 88.22% 
अमरावती : 89.12%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT