Rajesh Tope esakal
महाराष्ट्र बातम्या

मास्कमुक्त महाराष्ट्रावर आरोग्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण म्हणाले, कोरोनाचा धोका टळलेला नाही...

ग्रामीण भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही; राजेश टोपे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यातील कोरोना (Corona)रुग्णांची संख्या कमी होत आहे. तिसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. त्यामुळे मास्कमुक्त महाराष्ट्राची (Maharashtra) चर्चा कालपासून सुरू झाली आहे. यावरच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आज स्पष्टीकरण दिले.

राज्यातील काही भागांमध्ये अजूनही रूग्णसंख्या वाढत आहे. शहरातील रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरी ग्रामीण भागात आजही रूग्णांची संख्या वाढत आहे. मात्र हे रूग्ण पाच ते सात दिवसांच्या उपचारानंतर बरे होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

मास्कमुक्त महाराष्ट्र याविषयी ते म्हणाले, रूग्ण संख्या कमी होत असली तरी इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड अशा देशांमध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल का? या देशांतील पार्श्वभूमीवर आपल्याकडे जे नियम आहेत त्यात काही बदल करता येतील का? याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यामुळे मास्क मुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हणालो नाही. कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे टास्क फोर्सने याबाबत मार्गदर्शन करावे. राज्यातील निर्बंध अजून किती दिवस ठेवायचे याविषयी मार्गदर्शन मिळाले तर त्याविषयी लोकांनाही दिलासा मिळू शकेल.त्यामुळे सध्यातरी मास्क मुक्त महाराष्ट्र यावर कोणतीही चर्चा नाही" असे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन व्हेरियंट संदर्भात बोलताना राजेश टोपे म्हणाले, सध्या नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे. नवा व्हेरियंट जास्त घातक आहे अशी माहिती मिळत आहे. परंतु नवीन व्हेरियंटचा रुग्ण अजून कुठेच आढळला नाही. त्यामुळे जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT