Sharad pawar 
महाराष्ट्र बातम्या

मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी काळजी करायची गरज नाही. नव्या आमदारांना निवडणुकीला सामोरं जावं लागणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर विविध चर्चांना वेग आला आहे. आज (बुधवार) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची वाय. बी. चव्हाण सभागृहात बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सध्याच्या स्थितीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीला विजयी व पराभूत नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात एकत्र बैठक होणार असून, त्यानंतर शिवसेनेसोबत प्रस्ताव ठेवण्यात येण्यात येणार आहे. राज्यात सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वेळ मिळणार आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजितदादा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक हे चर्चा करणार आहेत. 

आज वसंतदादा पाटील यांची जयंती असल्यामुळे त्यांच्या विधानभवन परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधान भवनात आले होते.  त्यानंतर त्यांनी सभापतींकडे चहापान घेऊन पुढील आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी सर्व मंडळी रवाना झालेली आहेत. यावेळी विधान भवनाबाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर सदस्यांच्या आग्रहास्तव पवार साहेबांनी सर्वांसमवेत एक छायाचित्र काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Border Security : पाकिस्तान, बांगलादेश सीमेवर ६ हजार किमीची भींत, शत्रुला रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाहांकडून नव्या प्रकल्पाची घोषणा

Narendra Modi: ''लोकांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप नको'', मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

SRH vs RCB Live: रसिख दारच्या 'यॉर्कर'ने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला, विराट कोहली कसला पेटला... सेलिब्रेशन एकदा पाहाच Video

IPL 2026 : KKR ला मोठा धक्का! सर्वाधिक धावा करणारा फलंदाज स्पर्धेतून बाहेर; प्ले ऑफच्या शर्यतीत आता तग कसा धरणार?

काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांची नियुक्ती! पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी; ६९ जणांचा समावेश

SCROLL FOR NEXT