Mohit Kamboj Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

हनुमान चालीसाची भीती का वाटते? मोहित कंबोज यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल

माझ्यावर हल्ला झाल्यावर गृहमंत्री फोन करत नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अगोदरही एफआयआर हे खोट्या आणि फसव्या असतात. माझी एफआयआर नोंदविल्यानंतर त्यावर मी सही केली. पोलिस अचानक आम्हाला सांगतात की कलमे आम्हाला बदलायची आहेत. हाच प्रकार रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याबाबत झाला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे, अशी स्थिती कधीही घडलेली नाही, अशी टीका भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडीवर केली आहे. ते आज रविवारी (ता.२४) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एफआयआर नंतर देशद्रोहाचे कलम लावले जाते. मुंबई (Mumbai) पोलिस कळसूत्री बाहुलीप्रमाणे वागत आहे. हे बंद व्हायला हवे. लोकांच्या जीवाला धोका आहे. त्याच्याबरोबर खेळणे बंद करावे, असा इशारा कंबोज यांनी दिला. (Mohit Kamboj Attack On Chief Minister Uddhav Thackeray For Hanuman Chalisa)

सहा महिन्यांपासून मी किती वेळा पोलिस ठाण्यात माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली. दररोज मला सोशल मीडियावरुन धमक्या येतात. माझ्यावर लोकांनी हल्लाही केला. अद्यापही पोलिसांनी मला सुरक्षा दिलेली नाही. त्यानंतरही गृहमंत्र्यांनी स्वतःहून दखल घ्यायला हवे होते. मात्र त्यांनी तसे केलेले नाही. माझ्यावर हल्ला झाला. आम्ही सांगितल्याप्रमाणे तक्रार दाखल करणार की, तुमच्या इच्छेप्रमाणे .. माझ्यावर हल्ला झाल्यावर गृहमंत्री फोन करत नाहीत. त्यांचा बॅलन्स काय संपला काय ? मुख्यमंत्री स्वतःच कायद्याचे पालन करित नाहीत. १४४ कायदा लागू असताना त्यांनी स्वतः भेट दिली. त्यांनी कायद्याच्या राज्याचे चिंधडे उडवले. त्यांना माहित आहे की त्यांच्या एका खिशात पोलिस आणि दुसऱ्यात त्यांची यंत्रणा आहे. आज ते जे ताकद दाखवत आहे, ना भारतीय जनता पक्षावर मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर त्यांचेच लोक हल्ला करतात. त्यांचे आमदार, खासदार त्यानंतर वेगवेगळे स्पष्टीकरण देतात. आणि सामनात त्यांची पत्नी संपादक आहेत.

त्या लिहितात की प्रसाद दिले. अनिल परब म्हणतात सोडणार नाही. संजय राऊत म्हणतात, पाहिले जाईल. त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिले जाईल. ही काय भाषा आहे. ते काय लोकांना भडकवत आहेत . हल्ला करण्याचं बोलल जात आहे. जीवे मारण्याची धमकी देत आहेत. अद्यापही मुंबई पोलिसांना स्वतःहून दखल घेतलेली नाही. त्यांच्या सर्वांच्या वक्तव्यांची छाननी व्हायला हवी. जे-जे वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांनी दिले. त्याची छाननी व्हायला हवी. कशा प्रकारे षडयंत्र चालू आहे. येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला होऊ शकतो. माॅब लिचिंग करण्याची तयारी बंगालनंतर महाराष्ट्राचे सरकार करायला जात आहे. उद्धव ठाकरे हे जनाब ठाकरे साहेब झाले आहेत. मग ते काय सांप्रदायिक झाले आहेत का ? खुर्चीच्या लालसेपायी त्यांनी स्वतःची विचारधारा तोडली. त्यांना हनुमान चालीसाची भीती का वाटते. त्यांना हनुमानच्या नावाने भीती का वाटते. ते हिंदु आहेत. प्रत्येक हिंदुंसाठी मातोश्री हे मंदिर आहे. तुम्ही विचारधारा का बदलली, असा सवाल कंबोज यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूजा खेडकरच्या कुटुंबाचा नवा कारनामा, अपहरणात वडिलांचा सहभाग; गुन्ह्यातली कार घराबाहेर, आईने पोलीसांवर सोडले कुत्रे

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Asia Cup 2025: टीम इंडियाला पाकिस्तानचा 'अपमान' करण्याची पुन्हा संधी; 'या' तारखेला India vs Pakistan समोरासमोर येणार; जाणून घ्या कसं

AI Deepfake Rules : बनावट व्हिडिओ अन् बातम्या पसरवाल तर थेट तुरुंगात जाल! संसदेत AI डीपफेक कायद्यावर मोठा निर्णय, नक्की वाचा

SCROLL FOR NEXT