mumbai rain update 
महाराष्ट्र बातम्या

मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी - IMD

BMC ने आदेशाद्वारे नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

BMC ने आदेशाद्वारे नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे.

अखंड जून महिना पावसाशिवाय कोरडा गेला. मात्र आता पावसाने जूनची कसर जुलै महिन्यात भरून काढली असल्याचे चित्र आहे. मागील आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार पाऊस झाला नाही. परंतु आता राज्यासह देशातील अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे.

राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबईसह इतर भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्यानं चार दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. अत्यावश्यक कामांसाठी घरातून बाहेर पडण्यास सांगितले आहे.

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार

आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील मुंबईसह कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना गेल्या 24 तासात पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. शनिवारी मुंबईत 'रेड' अलर्ट जारी केला होता. मात्र मुंबईत केवळ 2.2 मिमी पावसाची नोंद झाली असून ही दिलासादायक बातमी आहे.

महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील 130 गावांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील गडचिरोली, हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या जिल्ह्यातील काही नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत 200 हून अधित लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आदेशाद्वारे नागरिकांना समुद्र किनाऱ्यावर जाण्यास मनाई केली आहे. बीएमसी कमिशनर इक्बाल सिंग चहल यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, शहरातील समुद्रकिनाऱ्यांना सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेतच भेट देता येणार आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त मुसळधार पावसाचा परिणाम दक्षिणेकडील तेलंगणा राज्यावर झाला आहे. येथील अनेक रस्ते पाण्याखाली असल्याने वाहतूकीसाठी बंद झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT