Nana Patole sakal media
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या आदेशाचं पालन केल्यानं भाजपला का पोटदुखी?

देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवे - नाना पटोले

सकाळ डिजिटल टीम

देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवे - नाना पटोले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मागली काही दिवसांपासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपाच्या नेत्यांनी पटोले यांच्यावर टीकाही केली. दरम्यान, आता पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा साधला आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सराकारचा आमच्यावर दबाव असल्याचे सांगत असेल तर संवैधानिक व्यवस्था आज धोक्यात आली आहे हे स्पष्ट आहे, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

आज प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते म्हणाले मागील सात वर्षात देशाचे चित्र बदलले आहे. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे त्यामुळे आपण सावध रहायला हवे असे सूचक वक्तव्य करत त्यांनी केंद्र सरकावर टिकास्त्र सोडले आहे. आज मुख्यमंत्री बाहेर पडले याबाबत ते म्हणाल, कोरोना काळात देशाच्या पंतप्रधानांनी काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं. आपण शाळा, बाजार, सगळे बंद केले होते. देशाच्या पंतप्रधानांच्या आदेशाचे मुख्यमंत्र्यांनी पालन केले तर भाजपला का त्रास होत आहे, त्यांच्या पोटात का दुखत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मालेगावमधील काँग्रेस नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेशावर ते म्हणाले, या असे बदल राजकारणात चालत राहणार आहेत. कारण प्रत्येकाला पक्ष वाढवायचा आहे, आणि पक्ष वाढीचे स्वातंत्र्यही आहे. कोण इकडे येणार, कोण तिकडे जाणार, यात टेन्शन घेण्यासारखे काहीच नाही. जनतेचे मूळ प्रश्न बाजूला सारण्यासाठी धर्मांधतेचे वातावरण तयार केले जात आहे. मुंबईतील त्या गार्डनला नाव देण्याचं काम महापालिकेचे आहे. अस्लम शेख गार्डनचे नामकरण करायला गेले नाहीत. त्यांनीच मंजूर करुन घेतलेल्या निधीतून या गार्डनचे सुशोभिकरण झाले आहे, त्याचे ते उद्घाटन करणार आहेत. तिथे टिपू सुलतान हे नाव पूर्वीपासून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

भाजपाच्या अमित देशमुख आणि नितीन राऊत यांच्या विधानावर ते म्हणाले, फडणवीस यांच्या काळात काय झालं? त्यावेळी फक्त धिंगाणा सुरू होता. आमच्या मंत्र्यांनी जी भूमिका मांडली ती गैर नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सावधान करणं यात काय गैर आहे असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT