Nashik Water Crisis esakal
महाराष्ट्र बातम्या

Nashik Water Crisis : 10 तासांची वणवण आणि 4 हंडे पाणी, संघर्ष सुरू पण अजूनही महाराष्ट्र तहानलेलाच

महाराष्ट्रात अजूनही आड डोंगराच्या ठिकाणी महिलांचा पाण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Nashik Water Crisis : कहाणी आहे नाशिकपासून ८० किमी अंतरावर असलेल्या डोंगरात २०० लोकांच्या वस्तीतल्या जांबूनपाड्यातील प्रत्येक महिलेची. इथल्या प्रत्येक महिलेच निम्म आयुष्य हे पाणी भरण्यात जात आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात त्यांनी तेथील एका महिलेची कहाणी जाणून घेतली.

Nashik Water Crisis

सुनीता खुताडे ही महिला याच पाड्यातली आहे. ती सांगते जर ती पहाटे ४ वाजता उठली नाही तर दिवसभर पाणी मिळणं फार कठीण होऊन बसतं. त्यामुळे तिचा दिवस सुर्योदयाच्या खूप आधी सुरू होतो. सकाळी उठून मुखमार्जन करून ती लगेच दोन कळशा पाण्याच्या शोधात घराबाहेर पडते. पाण्याचा शोध गावाबाहेर घ्यावा लागतो.

एका लहानशा खड्ड्यात उतरून तिथे सपाट ताटाने भरता येईल असा आणि एवढाचा पाण्याचा स्रोत आहे. मोठ्या कष्टाने त्या खड्ड्यात उतरल्यावर तिथे झोपलेल्या एका वृद्ध महिलेने तिला मारहाण केली तेवढ्यात ते पाणीही संपले. पण सुनीताने हार न मानता ते पाणी परत भरण्याची वाट पाहिली आणि १ तासानंतर कसेबसे अर्धे भांडी पाणी भरले.

Nashik Water Crisis

तेवढंच पाणी घेऊन ती घरी जाते कारण मागून इतर बायक्यांच्याही तिथे पाणी भरण्यासाठी रांगा लागलेल्या असतात. ती भांडी घरी ठेवते आणि मग पुन्हा जंगलात इतर कुठे पाण्यचा बारीकसा स्रोत सापडतो का याच्या शोधात ती निघते. ती रोज किमान १० तास पाण्याभोवती घालवते. त्यातले ६ तास पाणी शोधून भरण्यासाठी आणि ४ तास घरी जाण्या येण्यासाठी.

ती सांगते गेल्या 11 वर्षांपासून माझा संपूर्ण दिवस पाण्याभोवती फिरत आहे. आम्ही या खड्ड्यांकडे एकमेकांच्या विरोधात धावतो, शॉर्टकटने टेकडीवर चढतो, जागा बुक करण्यासाठी तिथे झोपतो - हे सर्व खूप थकवणारे आहे. त्यांची मुले बाळेही त्यांच्या सोबत पाण्यासाठी वणवण करत असतात.

Nashik Water Crisis

ही वणवण दुपारच्या ४० डिग्री तापमानातही सुरूच असते. कुठे गढूळ पाणी मिळते. मग ते गाळून स्वयंपाकासाठी वापरले जाते. त्यानंतर ताटं धुतलेलं पाणी ते घर सारवण्याच्या शेणासाठी, मातीसाठी, झाडांसाठी वापरतात.

सुनीता सांगते 'दीर्घ प्रतीक्षा असूनही आम्ही जवळच्या पाण्याच्या स्त्रोताला प्राधान्य देतो कारण इतर ठिकाणे दूर आहेत आणि पहाटे आणि रात्री उशिरा जंगलात एकटे जाणे धोकादायक आहे.'

या त्रासाला वैतागलेली सुनीता जिथे मुबलक पाणी आहे अशाच ठिकाणी मी माझ्या मुलींचे लग्न करेन असं सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT