nawab malik 
महाराष्ट्र बातम्या

भाजपकडे आकडा नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं : नवाब मलिक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात संकट असताना सत्ता स्थापनेला असा उशीर होणे बरं नाही. भाजपकडे बहुमत नाही, दिलेला शब्द पाळत नाही. फोडाफोडी करू शकतात. पटलावर मतदानाची वेळ आली तर राष्ट्रवादी भाजपविरुद्ध असेल. शिवसेना-भाजप एकत्र येत नाही. पर्यायी सरकार उपलब्ध करणे हे महत्त्वाचं आहे. शिवसेनेने तयारी दर्शवली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र भूमिका घेणार आहे. भाजपकडे आकडा नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलेले आहे. मात्र, भाजपकडे बहुमताचा आकडा नसल्याने काय होणार याकडे सर्वांचे  लक्ष आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे सरकार स्थापन होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नवाब मलिक म्हणाले, की सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी उशीर लावायची गरज नव्हती. भाजपला आधीच बोलवायला हवं होतं. आमची भाजप विरोधात भूमिका राहणार आहे. पर्यायी सरकार काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन गेल्याशिवाय होणार नाही. पवारांनी राज्यात काय केलं हे अमित शाह यांनी विचारले, त्याला उत्तर आमच्यावतीने संजय राऊत यांनी दिले आहे. आमची 12 नोव्हेंबरला बैठक असून, या बैठकीत निर्णय घेऊ. पटलावर सरकार पडल्यावर पर्यायी सरकार येईलच. भाजप घोडेबाजारचे धंदे करतो. साम दाम दंड भेदला लोकांनीच नकार दिला आहे. भाजपकडे आकडा नसेल तर त्यांनी बाजूला व्हावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! सहकारी टॅक्सी सेवेसाठी सरकार नवे नियम आणणार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले तातडीचे आदेश

Shirur Firing Case : करडे घाटात झालेल्या अंदाधूंद गोळीबार प्रकरणानंतर अलर्ट झालेल्या पोलिस दलाने नामचीन गुंडांची धरपकड केली सुरू

Mumbai: पूरमुक्त मुंबई करणार म्हणणाऱ्या BMCला पहिल्याच पावसात धप्पा, अंधेरी सबवे पाण्यात, VIDEO VIRAL

Panhala Tourism Tax : पन्हाळागडावर पर्यटकांची उघड लूट? पर्यटन कराच्या नावाखाली वर्षाकाठी 5 ते 7 लाखांचा घोळ; 'या' गोष्टीमुळे संशय वाढला!

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन! तब्बल 4,500 बसेस धावणार, दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

SCROLL FOR NEXT