Governor Koshyari Controversial Statement Chhatrapati Shivaji Maharaj
Governor Koshyari Controversial Statement Chhatrapati Shivaji Maharaj sakal
महाराष्ट्र

राज्यपालांच्या वक्तव्यावरून वाद पेटला! राष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेड आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ''समर्थ नसते तर शिवाजीला कोणी विचारलं असतं का?'' असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. (Governor Koshyari Controversial Statement Chhatrapati Shivaji Maharaj)

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तसेच आपले विधान मागे घ्यावे. असं केलं नाहीतर त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करू, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले होते. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांच्या गुरु-शिष्य परंपरेचा दूरदूर पर्यंत काहीही संबंध येत नाही, असा निर्णय औरंगाबाद खंडपीठाने २०२३ ला दिला होता, असं सांगत राज्यपालांनी न्यायालयाचा अवमान केला असल्याचंही मिटकरी म्हणाले. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात येणार आहे. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात येणार आहे. दुसरीकडे संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली असून त्यांच्याकडून देखील राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येणार आहे.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले? -

औरंगाबाद येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते म्हणाले, ''देशात गुरु अशी परंपरा आहे, की ज्याला सद्गुरु मिळाला म्हणजे सगळं काही मिळालं आणि सद्गुरु नाही मिळाला तर काहीच मिळालं नाही. समर्थांच्या शिवाय शिवाजीला कोण विचारेल तरी का?'' इतकंच नाहीतर गुरुदक्षिणा म्हणून या राज्याच्या चाव्या तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटल्याचा दावाही राज्यपालांनी केला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : ममता बॅनर्जी यांचा जाहीर सभेत कलाकारांसोबत डान्स

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT