Sharad Pawar News | NCP News Updates | Maharashtra Political News Sakal
महाराष्ट्र बातम्या

घडामोडींना वेग! शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार देखील अडचणीत आले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. (Sharad Pawar News)

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांची बैठक घेतली त्यानंतर राज्यीतील सर्व आमदारांना मुंबईला पाचारण करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहाता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंबईत बोलवण्यात आले आहे. शिवसेने देखील सर्व आमदारांना पत्र पाठवले आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर महाविकास आघाडीतर्फे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत चर्चाच झाली नसल्याची माहिती आहे. नियमित विषयावर चर्चा करीत बैठक संपल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT