Nitesh Rane esakal
महाराष्ट्र बातम्या

अँजिओग्राफी करुन मला मारुन टाकण्याचा कट होता; नितेश राणेंचा गंभीर आरोप

न्यायालयीन कोठडीदरम्यान, नितेश राणेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

सुधीर काकडे

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोकाचा संघर्ष सुरु आहे. त्यातच राणे परिवार आणि शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष संपण्याचं नाव घेत नाहीये. त्यातच आता आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) पुन्हा एक गंभीर आरोप केला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजप (BJP) आमदार नितेश राणे यांच्या न्यायालयीन कोठडी दरम्यान, त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं. त्यावेळी आपल्याला मारून टाकण्याचा कट रचला गेला होता असा आरोप नितेश राणेंनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान मला एका प्रकरणात अडकवण्यात आलं. यावेळी आपल्याला पोलीस आणि प्रशासनाचा जो अनुभव आला तो थक्क करणारा होता असं नितेश राणेंनी विधानभवनात सांगितलं. "आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी अंजिओग्राफी करण्यासाठी आग्रह केला. माझा रक्तदाब कमी झालेला होता, मला ते जाणवत होतं, मात्र तरीही डॉक्टर ऐकण्यास तयार नव्हते. मात्र काही आमच्या ओळखीच्या लोकांनी सांगितलं की, अँजिओग्राफीच्या निमित्ताने तुमच्या शरिरात इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही अँजिओग्राफी करू नका." असे गंभीर आरोप नितेश राणेंनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT