Nitin Raut esakal
महाराष्ट्र बातम्या

''दानवेंनी आरोप करण्यापेक्षा आम्हाला सरकार्य करावे''

'भारनियमनाची स्थिती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात आहे.'

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राज्यात कोळसा अभावी भारनियमन सुरु आहे. यावरुन भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीवर भारनियमनावरुन टीका करित आहे. यावर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. कोळशाची टंचाई देशात आहे. त्यामुळे भारनियमन देशातील इतर राज्यातही आहे. मात्र काही नेते आमच्यावर टीका करित आहेत. त्यांनी अगोदर चार बोटे आपल्याकडे असल्याचे पाहावे, अशी टीका राऊत यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यावर केली. 'कोल इंडिया लिमिटेड' ही कंपनी देशातील सर्व वीज कंपन्यांना कोळशाचे पुरवठा करते. भारनियमनाची समस्या त्यांच्या व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे राऊत म्हणाले. (Nitin Raut Says, Raosaheb Danve Don't Blame Us But Should Help Us)

भारनियमनाची स्थिती फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात आहे. जर इतर राज्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली नव्हती, तर केंद्रीय मंत्र्यांनी सर्व राज्यांच्या ऊर्जामंत्र्यांची बैठक का घेतली, असा सवाल राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला केला आहे. रावसाहेब दानवेंनी फक्त आरोप करण्यापेक्षा आम्हाला सरकार्य करावे. ते रेल्वेमंत्री आहेत, असा टोला ऊर्जामंत्री राऊत यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री दानवे म्हणाले, ज्या वेळी केंद्राकडे कोळसा उपलब्ध होता, त्यावेळी राज्य सरकारने तो घेऊन त्याची साठवणूक केली नाही. कोळसा संपत आल्यानंतर राज्य केंद्राच्या नावाने ओरडत असेल, तर त्यांनी दुसऱ्या देशातून कोळसा आणा, असा सल्ला दानवे यांनी ठाकरे सरकारला दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT