ऊस तोडणी Canva
महाराष्ट्र बातम्या

ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी झाल्यास कारवाई! साखर आयुक्तांचा इशारा

ऊस तोडणीसाठी पैशांची मागणी झाल्यास कारवाई होणार! साखर आयुक्तांचा इशारा

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊस तोडणीकरिता शेतकऱ्यांना पैशांची मागणी होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

माळीनगर (सोलापूर) : ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊस तोडणीकरिता शेतकऱ्यांना पैशांची मागणी होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी दिले आहेत. यासाठी कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी नेमण्याची सूचना साखर आयुक्तांनी केली आहे.

ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊस तोडणी करताना ऊस पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, ऊस क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही अशी विविध कारणे सांगून ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी केली जाते. ऊस तोडणी मजूर व मुकादम यांच्या मागणीप्रमाणे शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही तर ऊस तोडणीस टाळाटाळ केली जाते. अशाप्रकारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस तोडणी मजूर, मुकादम व ऊस वाहनचालक यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी साखर आयुक्तालयास प्राप्त होत आहेत.

शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी जाहीर प्रकटन करून अशा प्रकरणातील गैरव्यवहारास आळा बसेल याची खबरदारी घ्यावी; तसेच शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्यासाठी कारखान्याच्या वतीने मोबाईल फोन नंबर, व्हाट्‌सऍप क्रमांक देण्यात यावा. कारखान्यांनी तक्रार निवारण अधिकारी म्हणून शेती विभागाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. या अधिकाऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर याची माहिती कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस तोडणी होत असलेल्या गावांमध्ये दर्शनी ठिकाणी व ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करावी. शेतकऱ्यांनी अशा स्वरूपाची तक्रार घटना घडल्यावर शेती अधिकारी यांच्याकडे लगेच करावी. तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास सदरची रक्कम तोडणी मजूर, मुकादम व वाहतूक कंत्राटदार यांच्या बिलातून वसूल करून संबंधित शेतकऱ्यास अदा करावी. तसेच तक्रार करण्यासाठी साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ई-मेलचा वापर करावा. तक्रारीमध्ये मजूर, मुकादम, वाहतूकदार यांचे नाव व वाहन क्रमांक नमूद करावा.

राज्यात यंदाच्या गाळप हंगामात उपलब्ध असलेला सर्व ऊस सर्वसाधारणपणे 145-150 दिवसांत गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची गाळप क्षमता असल्याने व इथेनॉल उत्पादनाकरिता साखर वळविली जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही, याबाबत शंका घेऊ नये. प्रादेशिक सहसंचालक (साखर) व साखर आयुक्त कार्यालय स्तरावर ऊस गाळपासंदर्भात नियमितपणे आढावा घेतला जाणार आहे, असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Prashant Raut Memorial: तुझ्यामुळे ‘सरणा’साठी जागा मिळाली, स्मारकासाठी आम्ही अपयशी; दोन दशकापासून ‘शहीद प्रशांत राऊत’ स्मारकासाठी उदासीनता!

SCROLL FOR NEXT