कोरोना sakal
महाराष्ट्र बातम्या

एक कोटी व्यक्‍तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका! जाणून घ्या नेमकं कारण

एक कोटी व्यक्‍तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका! जाणून घ्या नेमकं कारण

तात्या लांडगे

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच ओमिक्रॉनचा विळखाही घट्ट होत आहे.

सोलापूर : राज्यात 16 जानेवारी 2021 पासून कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण (Covid Vaccination) सुरू झाले असतानाही राज्यातील एक कोटी आठ लाख 83 हजार व्यक्‍तींनी एकही डोस घेतलेला नाही. ठाणे (Thane), नाशिक (Nashik), जळगाव (Jalgaon), नांदेड (Nanded), नगर (Nagar), सोलापूर (Solapur), बीड (Beed) या जिल्ह्यांतील सर्वाधिक व्यक्‍ती लसीकरणापासून दूर आहेत. लस न घेतलेल्यांनाच कोरोना (Covid-19), ओमिक्रॉनचा (Omicron) सर्वाधिक धोका असून त्यांच्यात विषाणूची तीव्रता अधिक असल्याची चिंता सार्वजनिक आरोग्य विभागाने (Public Health Department) व्यक्‍त केली आहे. (One crore people in the state are most at risk of Corona infection)

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच ओमिक्रॉनचा विळखाही घट्ट होत आहे. मुंबई (Mumbai), पुण्यातील (Pune) शाळा बंदचा निर्णय यापूर्वीच झाला असून राज्यात निर्बंधही लागू केले आहेत. तरीही, संसर्ग कमी झाला नसून सध्या बाधित होणाऱ्यांमध्ये लस न टोचलेलेच सर्वाधिक आहेत. त्यांच्यातील विषाणूची तीव्रताही अधिक जाणवू लागली आहे. दोन्ही डोस घेतलेल्यांना केवळ साधा ताप, सर्दी, खोकला असल्याची बाब समोर आली आहे. तरीही, राज्यातील तब्बल एक कोटी व्यक्‍ती पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी आलेच नाहीत. दुसरीकडे, 15 ते 18 वयोगटातील 60 लाख मुलांना कोवॅक्‍सिन (Covaxin) लस टोचणे अपेक्षित आहे. त्यातील 38 लाख मुलांनी अजूनही लस घेतलेली नाही. दरम्यान, ज्या व्यक्‍तींना लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले, त्यांनी त्याच लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घ्यावा, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

स्थानिक प्रशासनाच्या हाती शाळा बंदचा निर्णय

राज्यात कोरोनाचे दररोज सरासरी 32 हजारांवर रुग्ण आढळू लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आता संसर्ग वाढत असल्याने शाळांमधील (School) विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली आहे. राज्यस्तरावर शाळा बंदचा निर्णय होईल, याची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. परंतु, स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले.

लसीकरणात पिछाडीवरील जिल्हे

ठाणे, नाशिक, जळगाव, नांदेड, नगर, सोलापूर व बीड या प्रत्येक जिल्ह्यातील सव्वापाच ते दहा लाख लाख व्यक्‍तींनी तर यवतमाळ, बुलढाणा, लातूर, नंदूरबार, अमरावती, पालघर, धुळे, जालना, परभणी व अकोला या जिल्ह्यांमधील तीन ते पावणेपाच लाख व्यक्‍ती लसीकरणापासून दूर आहेत. नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), कोल्हापूर (Kolhapur), वाशिम (Washim), हिंगोली (Hingoli) व उस्मानाबाद (Osmanabad) या जिल्ह्यातील जवळपास 15 लाख व्यक्‍तींनी लस घेतलीच नाही. लस न घेतलेल्यांमध्ये विषाणूची (Corona Virus) तीव्रता अधिक असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसकर (Dr. Dilip Mhaiskar) यांनी स्पष्ट केले.

राज्यातील नऊ कोटी 14 लाख 35 हजार व्यक्‍तींनी प्रतिबंधित लस टोचणे अपेक्षित आहे. 100 टक्‍के लसीकरणासाठी राज्यात केंद्रे उभारली, तरीही एक कोटींहून अधिक व्यक्‍तींनी अजूनपर्यंत लस घेतली नाही. त्यांना कोरोना, ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका होऊ शकतो.

- डॉ. सचिन देसाई (Dr. Sachin Desai), सहसंचालक, सार्वजनिक आरोग्य, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT