Uday Samant  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uday Samant Latest News : गुवाहाटीला जावून आल्यानंतर फक्त माझं खातं बदललं, मी बदललो नाही; असं का म्हणाले उद्योगमंत्री?

'फायर ब्रिगेडचा प्रस्ताव आणला असला, तरी कधी कधी राजकीय आग देखील उठते'

सकाळ डिजिटल टीम

राज्यात काकांना सोडून पुतणे गेले आहेत. मात्र, आमच्या जिल्ह्यात काका-पुतणे एकत्र आहेत.

Kolhapur News : आजचे वातावरण जरी थंड असले आणि एमआयडीसीतील आगीच्या संदर्भाने फायर ब्रिगेडचा प्रस्ताव आणला असला, तरी कधी कधी राजकीय आग देखील उठते. त्यावेळी या ‘फायर ब्रिगेड’चा महाडिक आणि पाटील या दोघांनी मिळून उपयोग करावा, असं आवाहन उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.

यासाठी दोन गाड्या घ्यायला लागल्या तरी चालतील, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राजकीय आग पेटणार नाही, याची दक्षता घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं. गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), आमदार ऋतुराज पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी रंगली. आमदार ऋतुराज पाटील यांनी गोकुळ शिरगाव एमआयडीसीसाठी १३ कोटींच्या फायर स्टेशनला मंजुरी दिल्याबद्दल उद्योगमंत्री सामंत यांना धन्यवाद दिले. त्यावर नुसती प्रशासकीय मंजुरी देवून आम्ही थांबणार नाही. पुढील १५ दिवसांत निविदा काढून लवकरात लवकर फायर स्टेशनचे काम सुरू केले जाईल.

तसेच फायर स्टेशनची मागणी अतिशय योग्य असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले. राजकीय आग उठल्यानंतर महाडिक आणि पाटील यांनी ‘फायर ब्रिगेड’चा उपयोग करावा, असे त्या दोघांकडे पाहून आवाहन करताच उपस्थितांमध्ये हास्य पसरले.

सामंत म्हणाले, ‘मला आज मनापासून आनंद होत आहे की, राजकारणामध्ये मनभेद, मतभेद असतात. परंतु, एखाद्या कारणासाठी हे माझे काम आहे. माझ्या जिल्ह्यातील, मतदारसंघातील आणि माझ्या लोकांचे काम असल्याचे समजून सगळे हेवेदावे बाजूला ठेवून लोकप्रतिनिधी एकत्र येतात. त्याच भागाचा विकास होत असतो आणि तोच आदर्श दाखविणारे आजचे व्यासपीठ आहे.’

आमच्या जिल्ह्यात काका-पुतणे एकत्र

राज्याचे आणि कोल्हापूरचे राजकारण वेगळे आहे. राज्यात काकांना सोडून पुतणे गेले आहेत. मात्र, आमच्या जिल्ह्यात काका-पुतणे एकत्र आहेत, असे खासदार महाडिक आणि आमदार पाटील यांच्याकडून पाहून खासदार माने यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

‘गुवाहाटी’नंतरही मी बदललो नाही

‘उच्च शिक्षणमंत्री असताना मी केलेल्या कामांचा अनुभव आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितला. आजही माझे कामाला प्राधान्य आहे. गुवाहाटीला जावून आल्यानंतर केवळ माझे खाते बदलले आहे. मी बदललो नाही,’ असे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT