महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : आम्हाला विरोधीपक्षाची सत्ता द्या, आमची भूमिका स्पष्ट : राज ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मी तुमच्याकडे एक मागणी करायला आलो आहे. राज्याला एक कणखर, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्षातील आमदार तुमच्या मनातील खदखद विचारू शकतो. सत्तेतील आमदार हे करू शकत नाही. आज मी प्रबळ विरोधी पक्षासाठी तुमच्याकडे आलोय. आजपर्यंत देशात अशी मागणी कोणी केली नसेल. माझा आवाका पाहून मी ही मागणी करत आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

ईडीच्या चौकशीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीर सभेत बोलताना दिसले. पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर आज मुंबईत त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी पुण्यातील परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, ''पुण्यात अर्धा-पाऊण तास पाऊस पडला पण पुरती वाट लावून गेला. शहराची वाट लावून टाकली आहे. बसवर झाड कोसळल्याने पीएमपी ड्रायव्हरला जीव गमवावा लागला. सगळीकडे लाईट गेल्या होत्या. अंधारात बसलो होतो. मी कोणाशी बोलतोय हे कळत नव्हते. ठाण्यातही तिच परिस्थिती आहे. खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला आहे. शहराचा विचका झाला आहे. राजकारणी येऊन आश्वासने देतात आणि तुम्ही विश्वास ठेवता. पुण्यासारखे शहर विस्कळीत होत असेल.'' 

भाजपमुळे पीएमसी बँकेचा गैरव्यवहार झाला.  आज नागरिक पैसे काढण्यासाठी तरसले आहेत. पीएमसी बँक कोणी बुडवली, हे पाहा. न्यायालयाकडून न्याय मिळेल की नाही, ही शंका आहे. न्यायालय, सरकारकडून न्याय मिळत नाही. बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. तरुणांना दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT